कोलकाता – करोनामुळे क्रीडाक्षेत्राचे रूपही पालटणार असून अनेक नियमांना यापुढील काळात खेळाडूंना सामोरे जावे लागणार आहे. यातलाच एक भाग म्हणून बंगाल क्रिकेट संघटना (कॅब) आपल्या रणजी तसेच विविध वयोगटांतील खेळाडूंची मोसमाला प्रारंभ होण्यापूर्वी नेत्रचाचणी करणार आहे.
मुख्य प्रशिक्षक व माजी कसोटीपटू अरुणलाल यांनी ही माहिती दिली. करोनामुळे गेले तीन महिने सर्व खेळाडू क्रिकेटपासून तसेच सरावापासून लांब आहेत. आता जेव्हा नव्या मोसमाला सुरुवात होईल त्यावेळी चेंडूवर नजर राखणे सगळ्यांनाच शक्य होईल असे नाही. त्यासाठीच ही चाचणी आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.