बंगलुरू: कर्नाटकात नवीन सरकार स्थापन होऊन अनेक दिवस होऊनही तेथे मंत्रिमंडळ मात्र अस्तित्वात नाही. त्यामुळे राज्यात गंभीर पुरस्थिती निर्माण होऊनही तिकडे लक्ष देण्यासाठी राज्य सरकारची यंत्रणा साफ अपयशी ठरली आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी केली आहे.
मुख्यमंत्री येडियुरप्पा हे एक हातीच कारभार हाकत असून त्यांची क्षमता या साऱ्या समस्या हाताळण्यात अपयशी ठरत आहे. हा वनमॅन शो आणखी किती दिवस चालणार असा सवाल त्यांनी केला आहे. या राज्यात सरकारच अस्तितत्वान नाही अशी स्थिती असल्याचेही ते म्हणाले. ज्या वेगवान हालचाली करून येडियुरप्पांनी आमचे सरकार पाडले त्याच वेगाने त्यांना राज्यात मंत्रिमंडळाची स्थापना करण्यास मात्र जमलेले नाही.
राज्यात मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्याशिवाय सरकार पूरग्रस्तांना पुर्ण वेगाने मदत करू शकत नाही आणि राज्याच्या अन्य प्रश्नाही लक्ष घालू शकत नाही. राज्यात महसुल मंत्री, कृषी मंत्री, अर्थमंत्री, सहकार मंत्री,आणि प्रत्येक जिल्ह्यात पालक मंत्री अशी यंत्रणा अस्त्विात असती तर कर्नाटकवर ही अनागोंदीची वेळ आली नसती असे ते म्हणाले. पक्षाचा प्रत्येक आमदार हाच त्या मतदार संघांचा मंत्री आहे असे मुख्यमंत्री येडियुरप्पांनी केलेले विधान विनोदी आहे असेही ते म्हणाले.