Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघातानंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. या अपघतात २८० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९०० हून अधिक जण जखमी झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी हा अपघात घडला आहे. अद्यापही या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. यात मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या भीषण रेल्वे अपघातानंतर आज आम्ही तुम्हाला यापूर्वी देशात घडलेल्या पाच रेल्वे अपघातांची माहिती देणार आहोत.
1) पश्चिम बंगालच्या गॅसलमध्ये 3 ऑगस्ट 1999 रोजी मोठा रेल्वे अपघात झाला होता. दिल्लीला निघालेली ब्रह्मपूत्र मेल आणि औंध -आसाम एक्स्प्रेसची समोरासमोर धडक झाली होती. या अपघातामध्ये 285 लोकांचा मृत्यू झाला होता. तर या घटनेत 312 लोक जखमी झाले होते. 2) मध्यप्रदेशच्या बिलासपूरमध्ये 14 सप्टेंबर 1997 रोजी अहमदाबाद -हावडा एक्स्प्रेसचा भीषण अपघात घडला होता. ट्रेनचे पाच डबे नदीत कोसळले होते. या अपघातामध्ये 100 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर 200 पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले होते.
3) बागमती रेल्वे पुलावर 6 जून 1981 रोजी या ट्रेनचे डबे रेल्वे रुळावरून घसरले होते. ही ट्रेन मानसी वरून सहरसाकडे चालली होती. या रेल्वेचे सात डबे हे थेट नदीत कोसळले होते. या अपघातामध्ये 300 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मात्र दुसरीकडे या अपघातात 800 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा दावा गेला होता. हा आतापर्यंतचा सर्वात भीषण अपघात होता. 4) पंजाबच्या खन्ना जिल्ह्यात जम्मू तवी-सियालदह एक्स्प्रेस आणि अमृतसर गोल्डन टेंपल एक्स्प्रेसची धडक झाली होती. या अपघातामध्ये 209 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 120 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते.
5) बिहारच्या गयामध्ये 10 सप्टेंबर 2002 रोजी रेल्वे अपघात घडला होता. भरधाव जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसचे काही डबे रेल्वे रुळावरून घसरून थेट नदीत पडले. या अपघातामध्ये 150 लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, रेल्वे अपघाताच्या या घटनांमुळे आतापर्यंत अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. शुक्रवारी ओडिशा रेल्वे अपघातानंतर यापूर्वी घडलेल्या अनेक घटना यानंतर समोर आल्या आहेत.