Odisha Train Accident – ओडिशा बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ प्रचंड भयंकर असा अपघात झाला आहे. देशातील सर्वात मोठा अपघात म्हणून याकडे बघितले जात आहे. सम्पूर्ण देशाला या अपघातामुळे हादरा बसला आहे. आज भारतीय शांत आहे. प्रत्येक भारतीयांचे डोळे पाणावले आहे.
#BalasoreTrainAccident | “I was nearby when this accident happened, we rescued around 200-300 people,” says Ganesh, a local #OdishaTrainAccident pic.twitter.com/d8PkJNEPRY
— ANI (@ANI) June 3, 2023
दरम्यान, ओडिशा बालासोर रेल्वे अपघातात 238 जणांचा मृत्यू झाला आहे. 900 लोक अजूनही जीवन-मरणाची झुंज देत आहे. अशात प्रत्येकाला एकाच वाटत आहे की घटनेतील प्रत्येक जीव वाचवायला हवा. मृतांचा आकडा आता वाढू नये. जेव्हा ट्रेनची धडक बसली आणि सर्वत्र आरडाओरडा झाली. त्यावेळी लोकांचे प्राण वाचवणारी व्यक्ती होती. देवदूता सारखा तो लोकांना बाहेर काढत होता. अपघातात अडकलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यासाठी हा मुलगा देवापेक्षा कमी नाहीच.
दरम्यान गणेश नावाची व्यक्ती घटनास्थळाजवळच होती. आधी भयानक आवाजाने त्याचे हात पाय थरथर कापयला लागले. यानंतर मोठा अपघात झाल्याचे त्याला समजले. धावत जाऊन पोहोचल्यावर काही वेळ कुठे जायचे आणि कोणाला मदत करावी हे त्याला समजत नव्हते.
सर्वत्र नुसता धूर होता. रक्ताच्या थारोळ्या होत्या. लोकांचे हाल होत होते. क्षणाचाही विलंब न करता गणेश एका बोगीत शिरला आणि लोकांना बाहेर काढू लागला. अडकलेल्यांना कसेबसे बाहेर काढण्यात आले. त्याने तब्बल 200-300 लोकांचे प्राण वाचवले. एकीकडे ही बातमी कळताच रुग्णालयाकडे धाव घेणारे लोक. रक्त देण्यासाठी लोक रांगेत उभे आहेत. कोणीही अपील केले नाही.
कोणताही कायदा यातून कुणालाही होणार नाही. पण मनातून एकच गोष्ट निघाली, प्रत्येक जीव वाचवायला हवा आहे. रुग्णालयाबाहेर रांगा लागल्या आहेत. आजूबाजूचे लोक पळत सुटले आणि बचावासाठी पुढे आले. लष्कराचे जवान, एनडीआरएफ, एसडीआरएफ, राज्य पोलीस दल या सर्वांनी लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली.
गणेशने सांगितले की,’त्याने जमेल तितके लोकांना वाचवले. अपघाताचे चित्र इतके भीषण आहे की त्याची कल्पनाही करता येत नाही. एका ट्रेनच्या वर दुसरी ट्रेन चढली आहे. मृतदेह पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. मृतदेह इतके आहेत की त्यांची ओळख पटवणेही कठीण झाले आहे.’ संपूर्ण देश हादरला आहे. अश वेळी देवदूत म्हणून उतरलेल्या गणेशसारख्या लोकांना आज देश कडक सॅल्यूट करत आहे. लोकांचे प्राण वाचवले. अन्यथा हा आकडा अंदाजापेक्षा वर गेला असता.