नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर करताना एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. केंद्र सरकारने आपला अर्थसंकल्प सादर करताना अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. यात महिला, शेतकरी तसेच विद्यार्थ्यांचा उल्लेख केला आहे. महत्वाचं म्हणजे आरबीआयचं डिजिटल चलन येईल अशी मोठी घोषणा यावेळी त्यांनी केली. मात्र गेल्या दोन वर्षात करोनाचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य करदात्यांना दिलासा मिळेल असं वाटलं होतं. पण कररचनेत कोणतेही बदल न झाल्याने पुन्हा एकदा पदरी निराश पडली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
अर्थसंकल्प नव्हे निवडणूक संकल्प!#Budget2022
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 1, 2022
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याविषयी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना, “हा अर्थसंकल्प नव्हे निवडणूक संकल्प आहे” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.