नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील पहिल्या अमृत भारत ट्रेनला शनिवारी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ही ट्रेन श्रीरामनगर अयोध्येपासून ते बिहारच्या दरभंगा जिल्ह्यासाठी धावणार आहे.
ही अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये एक किलोमीटर ते 50 किलोमीटरच्या प्रवासासाठी किमान भाडे 35 रुपये आकारणार आहे.
ज्यामध्ये आरक्षण शुल्क आणि इतर प्रकारचे शुल्क समाविष्ट नसल्याची माहिती रेल्वे बोर्डाने दिली आहे. मात्र, इतर रेल्वेच्या तुलनेत या अमृत भारत ट्रेनचा प्रवास 17 टक्के महाग होणार आहे.