नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. बेरोजगार आणि महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यना यंदाच्या अर्थसंकल्पाकडून मोठी आशा होती. त्यानुसार सरकारच्या वतीने बजेट सादर करण्यात आले अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा पाचवा अर्थसंकल्प होता. सर्वसामान्य टॅक्स भरणाऱ्या नागरिकांना अर्थसंकल्पातून मठ दिलासा मिळाला आहे. या अर्थ संकल्पाद्वारे करपात्र उत्पन्नाची मर्यादा 7 लाखांनी वाढवण्याची घोषणा सीतारामन यांनी केली.
सध्या 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न असलेले नागरिक कोणताही टॅक्स भरत नाही. ही मर्यादा 7 लाखांपर्यंत वाढवण्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांनी घोषणा केली. नव्या कररचनेचा स्वीकार करणाऱ्यांना ही पद्धती लागू होणार आहे.
नव्या करश्रेणीत 2.5 लाखांपासून स्लॅब सुरू झाले होते. आता स्लॅब्जची संख्या 5 पर्यंत कमी करण्यात आली आहे.
त्यानुसार..
3 लाखांपर्यंत – कोणताही कर नाही
3 ते 6 लाख – 5 टक्के
6 ते 9 लाख – 10 टक्के
9 ते 12 लाख – 15 टक्के
12 ते 15 लाख – 20 टक्के
15 लाखांहून जास्त – 30 टक्के
अर्थसंकल्पाच्या सुरुवातीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्राधान्य असलेले सप्तर्षी सांगितले. ज्यामध्ये सर्वसमावेशक विकास, शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमतांचा खऱ्या अर्थाने वापर करणे, हरित विकास, तरुणांचं सामर्थ्य आणि आर्थिक क्षेत्र अशा महत्वाच्या गोष्टींचा समावेश असल्याचे स्पष्ट केले.