नागरिकांनी काळजी घेत केली खरेदी
सासवड (प्रतिनिधी) – येथे करोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी रक्षाबंधन व सोमवारचा आठवडे बाजार एकत्र आल्याने सासवडमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती.
सासवड शहर यापूर्वी लॉकडाऊन असल्याने नागरिकांना खरेदीची संधी मिळाली नव्हती; परंतु लॉकडाऊन उघडल्यानंतरही नागरिक बाजारात येत नव्हते. मात्र, सोमवारी आठवडे बाजार व नारळी पौर्णिमा-रक्षाबंधन सण एकत्र असल्याने ग्रामीण भागातील लोकांनी सासवड येथे गर्दी केली होती. त्यामुळे नागरिक हळूहळू सर्व नियम पाळत, स्वत:ची व इतरांची काळजी घेत खरेदीसाठी बाहेर पडत असल्याने व्यावसयिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.