नागपूर – आषाढी वारीनिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहून वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी केली होती. त्यांची ही मागणी आता मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या विदर्भातील वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विदर्भातून वारीसाठी तीन विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. या रेल्वे नागपूर, अमरावती आणि खामगावमधून सोडल्या जाणार आहेत.
विदर्भातील काही जिल्ह्यात या रेल्वे गाड्यांचा थांबा असल्यामुळे वारकऱ्यांची मोठी सोय झाली आहे. यामुळे एसटी बसला होणारी गर्दी देखील नियंत्रणात येणार आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहून आषाढी वारीनिमित्त विदर्भातून विशेष रेल्वे सोडण्याची मागणी केली होती. अखेर गडकरी यांच्या मागणीला रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविक भक्तांना पंढरपूरला जाणे सोयीचे व्हावे यासाठी केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari जी यांच्या विनंतीवरून पंढरपूरसाठी स्वतंत्र ज्यादा रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यास रेल्वे मंत्रालयाकडून मंजूरी देण्यात आली आहे. pic.twitter.com/UkcdgvZNj3
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) June 16, 2023
यासाठी श्री गडकरीजी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री श्री @AshwiniVaishnaw जी यांचे विशेष आभार मानले आहेत.
वारीसाठी सोडण्यात येणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक असे असेल … pic.twitter.com/6oSBFvTkBu
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) June 16, 2023
रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयामुळे वारकऱ्यांचा प्रवास सूकर होणार आहे. तसेच प्रवासासाठी होणारी गर्दी देखील कमी होईल. अखेर गडकरींची मागणी मान्य झाल्यानंतर त्यांनी ट्वीट करत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. याशिवाय त्यांनी रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक देखील ट्वीटमध्ये दिले आहे.