मुंबई- जुन महिन्यात पडणाऱ्या पावसामुळे परिक्षाकेंद्राची दुरावस्था होते. त्यामुळे अधिक पाऊस असलेल्या भागात परिक्षाकेंद्रासाठी पुर्वतयारी करणेही अवघड आहे, असे मत गडचिरोलीचे गोंडवाना विद्यापीठ व मुंबई विद्यापीठाने राज्यस्तरीय समितिच्या माध्यमातून उच्च व तंत्रशिक्षण विभागाला कळवले आहे.
पदवी आणि पद्वुत्तरच्या परिक्षा जुन-जुलैमध्ये होणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र या महिन्यात पावसाळा असतो. काही शिक्षण संस्था तर कोव्हिट सेंटरसाठी देण्यात आले आहे. त्यामुळे पुर्वतयारी करणे लवकर शक्य नाही.
दरम्यान, त्यामुळे एका विद्यापीठाची परिक्षा रद्द झाली तर तर सर्वच विद्यापीठाची परिक्षा रद्द होईल. तसेच 31 मेे पर्यंत प्रात्यक्षिक परिक्षा घ्याव्या असं सांगण्यात आलं होतं. मात्र इमारती कोरोनाच्या सेंटरसाठी दिल्या असल्याने त्या घेण्यात आल्या नाहीत. त्यामुळे या परिक्षा घ्यायच्या की नाही यावर 20 जुनपर्यंत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत निर्णय देतील.