राजेंद्र वारघडे
पाबळ (प्रतिनिधी) – सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत ग्रामीण भागातून तीव्र प्रतिक्रिया मिळत आहे. अश्यातच क्षणाक्षणाला येत असलेल्या घडामोडींमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
त्याबद्दल तीव्र नापसंती तर आहेच पण ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये सुध्दा एक प्रकारची प्रगल्भता आहे. त्याबाबत राज्यपाल पद हे सुद्धा निर्वाचित असायला पाहिजे असे मत सर्वसामान्य शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे..