पुणे : सध्या राज्यातील राजकारणाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. काल (शनिवार, दि.२३) राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी शपथ घेतली. राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फणवीस आणि अजित पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
दरम्यान, अजित पवार यांच्या शपथविधी नंतर राज्यातील घडामोडींना एक वेगळे वळण आल्याचे दिसून येते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर आरोप केला आहे.
मलिक म्हणाले, “राष्ट्रवादीचे ५० आमदार आमच्यासोबत आहेत. मात्र त्यातील सर्व आमदार आमच्यासोबत हॉटेलमध्ये नाहीत. यातील ४ आमदारांना भाजपने दुसरीकडे कुठेतरी डांबून ठेवलं आहे. आम्ही त्यांच्या सातत्याने संपर्कात आहोत. ते लवकरच परत येतील असा आमचा विश्वास आहे”. असं नवाब मलिक म्हणाले.
Nawab Malik, Nationalist Congress Party (NCP): 50 MLAs are with us but not everyone is at the hotel, 4 MLAs who are kept somewhere by BJP people, are in constant touch with us and will definitely come back. #Maharashtra pic.twitter.com/gNbywXXVU6
— ANI (@ANI) November 24, 2019