नगर,(प्रतिनिधी) – जिल्ह्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. तर दुसरीकडे नगर तालुक्यात दुष्काळाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. अनेक गावांत पाण्याचे दुर्भीक्ष जाणवत असून हाता तोडाशी आलेले पिके पाण्या अभावी सोडून देण्याची वेळ शेतकर्यांवर आल्याने त्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे.
तालुक्यात अत्यल्प पावसामुळे बहुतांशी तलाव, बंधारे, विहिरी, कुपनलिका कोरड्याठाक पडल्या आहेत. नगर तालुक्यातील मांजरसुंबा, डॊंगरगण, इमामपूर, ससेवाडी, बहिरवाडी, गुंडेगाव, राळेगण, कवडगाव, दशमी गव्हाण, सांडवे, मदडगाव या गावात पाण्याची तिव्र समस्या निर्माण झाली असून जनावरांच्या चार्याचा प्रश्न ही तितकाच गंभिर बनला आहे. पाण्यासाठी महिलांना भटकंतीची वेळ आली आहे.
जानेवारी महिन्यात ३० गुंठे टाॅमेटो पिकाची लागवड केली. त्यासाठी ५५ हजार रुपये खर्च आला. वातावरणातील बदलामुळे फवारणी मोठ्या प्रमाणात करावी लागली. तसेच झाड मोठे झाल्यावर त्याला बांधणीसाठी लोखंडी तार, बांबू, यावितिरिक्त मजुरीखर्च १० हजार रुपये वेगळे मोजावे लागले, असे एकूण ५५ हजार रुपये टाॅमेटोवर खर्च झाला.
हाता तोंडाशी आलेला घास पाण्याने दगा दिल्याने केलेला खर्चासह कष्टही वाया गेले. त्यात शेतमालाला हमीभाव नसल्याने कवडीमोल भावात विकण्याची बारी शेतकर्यावर आली आहे. त्यामुळे शेतमालाला सरकारने हमीभाव द्यावा. श्रीनाथ कदम शेतकरी, मांजरसुंबा