नागपूर – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यात आरोपप्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत. मलिक यांनी फडवीसांची पोलखोल करणार असल्याचं म्हणत हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचं विधान केलं होत. त्यानुसार त्यांनी आज फडणवीसांवर आरोप केले.
फडणवीस यांचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करत त्यांच्या आशीर्वादाने राज्यात बनावट नोटांचं रॅकेट चालत होतं, असाही आरोप मलिक यांनी केला. यावर फडणवीसांनी ट्विटरवरून मलिकांचं नाव न घेता पातळीसोडून टीका केली. शिवाय त्यांच्या आरोपांची खिल्लीही उडवली.
दरम्यान फडणवीसांना आरोपांसंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावेळी त्यांना हसू आवरेनासं झालं होतं. मला वाटतं मी केलेलं ट्विट पुरेसं बोलकं आहे, आशिष शेलार यांची प्रतिक्रियाही पुरेशी बोलकी आहे. यापेक्षा जास्त त्याला काही वजनही नाहीये, मग त्याला कशाला जास्त वजन देताय, असही फडणवीस यांनी म्हटलं. तसेच, फडणवीसांनी मलिक यांची हसत हसत खिल्लीही उडवली.
आता मलिक यांचं यावर का प्रत्युत्तर येत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.