पंढरपुर – माझ्यावर टीका करणारे लोक हे खरे वारकरी नाहीत. ते भागवत धर्माचे वारकरी नव्हे तर मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी आहेत असा पलटवार शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. आज येथे त्या पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, वारकरी संप्रदायाचा मी अवमान केल्याचा आरोप सातत्याने केला जात असल्या तरी त्यावर मी असंख्य वेळा खुलासे केले आहेत.
हा आरोप करणारे पेड वारकरी आहेत असे त्या म्हणाल्या. माझ्या वक्तव्यासारखी मते सावरकर आणि रविशंकर यांनीही व्यक्त केली आहेत मग त्यांना सवाल का केले जात नाहीत असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
भाजप शिंदे गटालाच संपवण्याचा प्रयत्न करीत आहे असा दावाही त्यांनी केला. एकनाथ शिंदे गटाला संपवण्याचा ट्रॅप फडणवीसांनी टाकला आहे. शिंदे गटातील 40 पैकी 20 आमदार कधी भाजप मध्ये दाखल होतील हे शिंदे यांना समजणारही नाहीं असे त्या म्हणाल्या.
शिंदे गट आणि भाजप यांच्याकडून आदित्य ठाकरे यांच्यावर खोटे आरोप केले जात आहेत असे नमूद करून त्या म्हणाल्या की एयु म्हणजे अनन्या उदास असे आहे, असा खुलासा रिया चक्रवर्ती यांनी करूनही त्यावरून अदित्य ठाकरेंच्या विरोधात कुभांड रचून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे असे त्या म्हणाल्या.