बॉलीवूडमधील कलाकारांना मध्येच पर्यावरणाचा कळवळा येतो. तसाच जुही चावलाला आला आहे. जुही चावला बऱ्याच काळापासून भारतात 5 जी तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीविरुद्ध संघर्ष करीत आहेत.
मोबाइल टॉवरमुळे होणाऱ्या रेडिएशनविरोधात ती जनजागृती करत असते. आता तिने या मोबाइल टॉवरविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. तिने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मी टेक्नॉलॉजीच्याविरोधात नसून टेक्नॉलॉजीचा वापर अधिक चांगल्या पद्धतीने करण्याच्या बाजूने आहे.
मात्र, हा आंधळा वापर आहे. वायरलेस कम्युनिकेशनमुळे होणारे घातक आरएफ रेडिएशन लोकांच्या आरोग्याला हानिकारक आहे, असे जुहीने आपल्या याचिकेत म्हटले आहे.
किरणोत्सर्गाचे महिला, पुरुष, मुले, लहान बाळ, प्राणी, पक्षी, वनस्पती आणि पर्यावरणासह संपूर्ण मानवजातीवर होणारे दुष्परिणाम बारकाईने अभ्यासले पाहिजे आणि ते लक्षात घेतले पाहिजेत, असे तिने म्हटले आहे.
जुहीने 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याबाबत पत्र लिहिले होते. आताही तिने हाच मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे.