नवी दिल्ली – म्यानमारमधील सुरक्षा स्थिती अनिश्चित असल्याचा इशारा परराष्ट्र मंत्रालयाने तेथील दूतावासाला दिला असून दूतावासातील कर्मचार् यांना सुरक्षेच्या कारणास्तव सित्वे येथील दूतावासामतून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
म्यानमारच्या त्या भागातील अनिश्चित सुरक्षा परिस्थिती लक्षात घेऊन म्यानमारच्या सित्वे शहरातील वाणिज्य दूतावासातून आपले कर्मचारी यंगून येथे हलवले असल्याचे भारताने शुक्रवारी सांगितले.
म्यानमारमधील परिस्थितीवर भारताकडून बारीक लक्ष ठेवले जात असून मंडाले येथील दूतावास नियमितपणे केर्यरत आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैयस्वाल यांनी म्हटले आहे.
म्यानमारमधील भारतीयांच्या अपहरणाचे वृत्त समोर आले होते. त्याबद्दल विचारले असता या विषयावर भारतीय दूतावास कार्यरत असून भारतीय युवक लवकरच मायदेशी परततील अशी आशा असल्याचे जैयस्वाल म्हणाले.
म्यानमारच्या अनेक भागांमध्ये लष्कर आणि बंडखोर गटांमध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे. बंडखोर गटांनी आधीच अनेक शहरे ताब्यात घेतली आहेत. यामुळे म्यानमारमधील सुरक्षा विषयक स्थिती अनिश्चित बनली असून ही स्थिती हळूहळू खालावते आहे.
प्रामुख्याने रखाईन प्रांतातील स्थिती बिघडते आहे. त्यामुळे म्यानमारमधील भारतीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्वाची पावले उचलली जात आहेत, असेही जैयस्वाल म्हणाले.
तात्पुरती उपाययोजना म्हणून सित्वे शहरातील वाणिज्य दूतावासातील कर्मचार् यांना यान्गून येथे हलवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. म्यानमारमध्ये १ फेब्रुवारी २०२१ रोजी सैन्याने उठाव करून सत्ता काबीज केल्यापासून लोकशाहीच्या पुनर्स्थापनेच्या मागणीसाठी व्यापक प्रमाणात हिंसक निदर्शने होत आहेत.