मुंबई – महापुरुषांच्या नावाचा उपयोग करून त्यांचा अवमान करणाऱ्या एकता कपूरच्या अल्ट बालाजी या चित्रपट निर्मिती कंपनीवर सरकारने बंदी घालावी, अशी प्रतिक्रिया पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ स्मारक व अध्यासन समितीचे सदस्य तथा पुण्यश्लोक फाऊंडेशनचे अध्यक्ष धनंजय तानले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली होती.
त्याबाबत एकता कपूरने माफी मागितली आहे. एकताने असे म्हटले आहे की ‘मी त्या कार्यक्रमाशी असोसिएटेड नाही आहे आणि ते दृश्य हटवण्यात आले आहे.’
एकताने अल्ट बालाजी च्या टीमच्या वतीने जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये असे लिहिले आहे की, ‘हे नुकतेच माझ्या लक्षात आले आहे की अल्ट बालाजी शो ‘व्हर्जिन भास्कर 2’ मध्ये एक दृश्य आहे ज्यामध्ये ‘अहिल्याबाई’ नावाच्या वसतिगृहाचे चित्रण करण्यात आले आहे, ज्याने समाजातील एका विशिष्ट वर्गाला नाराज केले आहे. ज्या दृश्याकडे लक्ष वेधले जात आहे त्यातून कोणताही अनादर करायचा नव्हता. फक्त पहिले नावाचा वापर वसतिगृहाच्या नावासाठी केला आहे, ज्यामध्ये आडनावाचा उल्लेख नाही. ”
तत्पूर्वी जी 5 या यू-ट्यूब चॅनलवरून दाखविण्यात येणाऱ्या विविध मालिकांमधून प्रेम, कामवासना संदर्भात प्रेक्षपण केले जात होते. या मालिकांमधून गैरप्रकार चालणाऱ्या हॉस्टेलचे नाव अहिल्याबाई लेडिज हॉस्टेल असे दाखविण्यात आले आहे. महापुरुषांच्या नावाचा वापर करून अवमान केल्याबद्दल निर्माते शोभा कपूर, एकता कपूर, दिग्दर्शक साक्षता दळवी व संगीता राव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.