-हभप नारायण म. डमाळे शास्त्री
जे इये गीतेची अक्षरें । जेतुली का कर्णद्वारे । रिघती तेतुले होती पुरे । अश्वमेध की।।
कुरुक्षेत्रावर भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. वेगवेगळ्या विषयांवर आधारित भगवद्गीतेत एकूण अठरा अध्याय आहेत. कोणत्या वेळी कोणता निर्णय घ्यावा, यासह अनेक विषयांचं ज्ञान गीतेत आहे. ते संस्कृतमधील ज्ञान विस्ताराने संत ज्ञानेश्वर महाराज यांनी श्री ज्ञानेश्वरीच्या रूपाने समाजासमोर ठेवले आहे.
श्री ज्ञानेश्वरीत माऊलींनी भगवद्गीता श्रवणाचे महत्त्व सांगितले आहे. या गीता ग्रंथांमधील जेवढी अक्षरे कर्ण द्वारातून हृदयात येतात म्हणजेच कानातून आपल्या हृदयामध्ये येतात, तितके अश्वमेध यज्ञ पूर्ण होतात. असे माऊलींनी श्रीज्ञानेश्वरीत सांगितले आहे. अश्वमेध यज्ञाला शास्त्रात फार महत्त्व आहे. श्रीमद्भगवद्गीतेच्या एका श्लोकात जर बत्तीस अक्षरे आहेत तर एक श्लोक श्रवण केल्याने 32 अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ मिळते.