नाईटिंगेल ऑफ इंडिया,स्वातंत्र्यसैनिक,महान कवयित्री सरोजिनी नायडू यांचा आज स्मृतिदिन.(निधन 2 मार्च 1949)मुळच्या बंगाली असलेल्या सरोजिनी यांचा ज्न्म हैदराबाद येथे 13 फेब्रुवारी 1879 रोजी झाला.आठ भावंडांमध्ये सरोजिनीजी सर्वात मोठ्या होत्या.त्यांचे एक भाऊ,वीरेंद्रनाथ हे क्रांतिकारक होते, त्यांनी बर्लिन समितीच्या स्थापनेत मोठी भूमिका बजावली.वीरेंद्रनाथ यांची 1931 मध्ये एका इंग्रजाने हत्या केली आणि त्यांचे दुसरे भाऊ हरिद्रनाथ हे कवी आणि अभिनेते होते.
सरोजिनीजी लहानपणापासूनच खूप हुशार विद्यार्थिनी होत्या, त्या बहुभाषिक होत्या.उर्दू, तेलगू, इंग्रजी, बंगाली भाषांचे खूप चांगले ज्ञान होते.सरोजिनी मद्रास विद्यापीठात मॅट्रिकच्या परीक्षेत वयाच्या 12व्या वर्षी, अव्वल ठरल्या,त्यामुळे त्यांचे कौतुक झाले.त्यांचे वडील एक वैज्ञानिक आणि डॉक्टर होते.स्वराज्याची चळवळ सुरु होताच नोकरी सोडून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली,व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हैदराबादचे पहिले सदस्य बनले.सरोजिनीजींच्या आई वरद सुंदरी देवी या लेखिका होत्या,त्या बंगालीत कविता लिहायच्या.त्यामुळे आईकडून साहित्य व वडीलांकडून देशप्रेमाचे धडे त्यान मिळाले.
सरोजिनीजी विशेषत: लहान मुलांवर कविता लिहायच्या, त्यांच्या प्रत्येक कवितेत एक नखरा असायचा, त्यांच्या आतलं मूल अजून जिवंत आहे असं वाटायचं. त्यांची बुलबुले हिंद ही कविता 1905 मध्ये प्रकाशित झाली, त्यानंतर सर्वजण त्यांना ओळखू लागले.यानंतर त्यांच्या कविता सातत्याने प्रकाशित होऊ लागल्या आणि अनेक लोक त्यांचे चाहते झाले, जवाहरलाल नेहरू, रवींद्रनाथ टागोर यांसारख्या दिग्गजांनी त्यंचे कौतुक केले त्यामुळे त्यांना नाइटिंगेल ऑफ इंडिया’ म्हटले जायचे.
’भारताची नाइटिंगेल’ किंवा ’भारत कोकिला’ ही उपाधी महात्मा गांधी यांच्याकडून मिळाली.त्यांच्या कवितेत लहान मुलांच्या कविता आणि देशभक्ती, प्रेम आणि शोक असे अनेक प्रकार असत.त्यांच्या कविता पाहून त्यांचे वडील आश्चर्यचकित व्हायचे आणि ते त्याच्या प्रती तयार ते मित्रपरिवारात वाटायचे.हैद्राबादच्या नबाब साहेबानी त्या बघितल्या व सरोजिनीजींना परदेशात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती दिली.आणि पुढील शिक्षणासाठी लंडनच्या किंग्ज कॉलेजमध्ये दाखल झाल्या. कॉलेजमधे शिक्षण घेत असतानाच सरोजिनी यांची डॉ. गोविंद राजुलू नायडू यांची ओळख झाली.व ओळखीचे रुपांतर प्रेमात व विवाहात झाले.त्यावेळी समाजाची काळजी न करता त्यांच्या वडिलांनी आपल्या मुलीचे लग्न लावून दिले.
गोपाळ कृष्ण गोखले यांनी सरोजिनीजींना सांगितले की त्यांनी त्यांच्या कवितांमध्ये क्रांतिचा समवेश करावा.वर्ष 1916 मध्ये, त्यांची महात्मा गांधींची गाठ पडली त्यांतर त्यांनी आपली सर्व शक्ती देशाला मुक्त करण्यासाठी देण्याचे ठरविले.त्यांनी प्रामुख्याने देशातील महिलांना जागृत केले, त्यावेळी महिला खूप मागे होत्या, अनेक प्रथांमध्ये अडकल्या होत्या, परंतु सरोजिनीजींनी त्या महिलांना त्यांचे हक्क सांगितले, त्यांना स्वयंपाकघरातून बाहेर काढले आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रोत्साहित केले. वर्ष 1925 मध्ये सरोजिनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या.
वर्ष 1930 मधे गांधींना सुरुवातीला महिलांना दांडी यात्रेसाठी सामील होण्याची परवानगी द्यायची नव्हती, पण नायडू आणि कमलादेवी चट्टोपाध्याय आणि खुर्शेद नौरोजी यांच्यासह इतर महिला कार्यकर्त्यांनी त्यांचे मन वळवले आणि मोर्चात सामील झाल्या.त्यावेळी गांधींना अटक झाल्यानंतर नायडू यांची मोहिमेच्या नव्या नेत्या म्हणून नियुक्ती झाली.वर्ष 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल ब्रिटिशांनी नायडू यांना 21 महिने तुरुंगात टाकले.स्वातंत्र्यानंतर त्या संयुक्त प्रांताच्या राज्यपाल झाल्या. त्या भारताच्या वर्चस्वात राज्यपाल पद धारण करणारी पहिल्या महिला बनल्या.त्यांचा वाढदिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो