पुणे – पावसाच्या दडीने यंदाचा ऑगस्ट महिना 1901 पासूनचा सर्वांत कमी पावसाचा ठरलाय. तर हवामान विभागाकडून सप्टेंबर महिन्यातही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. सद्यपरिस्थितीत शेती पिके हाताबाहेर जात आहेत. काही भागात पिण्याच्या पाण्याचेही दुर्भिक्ष जाणवत आहे. राज्यातील 300हून जास्त गावे तर दीड हजारापेक्षा जास्त वाड्या तहानल्यात.. भर पावसाळ्यात ऑगस्ट महिन्यातच या गावांना टॅंकरद्वारे पाणी पुरविण्याची वेळ प्रशासनावर आलीय..
दुसरीकडे खरीप हंगामातील शेती पीकांचे 50 टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. 25 हुन अधिक जिल्ह्यातील पीकांनी माना टाकल्यात. जनावरांच्या चाऱ्यापाण्याचे संकटही गहिरे होत चालले आहे. तर राज्यातील काही धरणांनी तळ गाठलाय. विरोधी पक्षातील नेते राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची सरकारकडे मागणी करत आहेत. राज्यावर कोरड्या दुष्काळाचं सावट असताना राज्यातील धरणांमध्ये सध्या नेमका किती पाणीसाठा आहे हे आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊया..
पुणे विभागातील टेमघर धरणाची पाणीसाठ्याची क्षमता ही 3.71 टीएमसी आहे. सध्या धरणात 2.97 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. अर्थात टेमघर धरणात सध्या 80 टक्के पाणीसाठा आहे.
वरसगाव धरणाची क्षमता 12.82 टक्के असून धरणात 100 टक्के पाणीसाठा आहे.
पानशेत धरणाची क्षमता 10.65 टीएमसी आहे. सध्या धरणात 100 टक्के पाणीसाठा आहे.
खडकवासलाची क्षमता 1.97 टीएमसी असून धरणात 59 टक्के पाणीसाठा आहे.
पवनाची क्षमता 8.51 आहे. धरणात सध्या 100 टक्के पाणीसाठा आहे.
मुळशी धरणाची क्षमता 18.46 टक्के आहे, तर सध्या पाणीसाठा 89 टक्के आहे.
चासकमानची क्षमता 7.58 टीएमसी असून धरणात 100 टक्के पाणीसाठा आहे.
भामा आसखेडची क्षमता 7.66 आहे. तर धरणात सध्या 88 टक्के पाणीसाठा आहे.
भाटघरची क्षमता 23.50 टीएमसी आहे सध्या धरणात 94 टक्के पाणीसाठा आहे.
नीरा देवघरची 11.72 टीएमसी क्षमता आहे. तर धरणात सध्या 100 टक्के पाणीसाठा आहे.
माणिकडोह धरणाची क्षमता 10.17 टीएमसी असून 61 टक्के पाणीसाठा आहे.
डिंभे धरणाची क्षमता 12.49 असून सध्या धरणात 93 टक्के पाणीसाठा आहे.
घोड धरणाची क्षमता 5.47 टीएमसी असून सध्या 23 टक्के पाणीसाठा आहे.
उजनीची क्षमता 117.21 टीएमसी असून सध्या केवळ 15 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.
धोमची 11.69 टीएमसी क्षमता आहे तर धरणात सध्या 81 टक्के पाणीसाठा आहे.
कण्हेरची 9.59 क्षमता असून सध्या 80 टक्के साठा आहे.
उमरोडीची 9.65 क्षमता असून 60 टक्के पाणीसाठा आहे.
कोयनाची क्षमता 105.24 टीएमसी असून सध्या 81 पाणीसाठा आहे.
वारणाची क्षमता 27.55 असून सध्या 89 टक्के पाणीसाठा आहे.
राधानगरीची क्षमता 7.77 असून सध्या 98 टक्के पाणीसाठा आहे.
दूधगंगा धरणाची क्षमता 23.97 टीएमसी असून सद्या धरणात 86 टक्के पाणीसाठा आहे.
*मराठवाडा विभाग –
मराठवाडा विभागातील जायकवाडी धरणाची क्षमता 102.67 टीएमसी असून सध्या 33 टक्के पाणीसाठा आहे.
निम्न दुधनाची क्षमता 8.54 असून सध्या धरणात 26 टक्के पाणीसाठा आहे.
मांजराची क्षमता 6.25 असून सध्या 26 टक्के पाणीसाठा आहे.
माजलगाव धरणाची क्षमता 10.98 टीएमसी असून सध्या धरणात 13 टक्के पाणीसाठा आहे.
पूर्णा येलदरी धरणाची क्षमता 28.60 असून सध्या 56 टक्के पाणीसाठा आहे.
नाशिक विभाग **
नाशिक विभागातील निळवंडे धरणाची क्षमता 8.19 टीएमसी असून धरणात सध्या 86 टक्के पाणीसाठा आहे.
भंडारदराची क्षमता 10.73 असून सध्या धरणात 100 टक्के पाणीसाठा आहे.
मुळा धरणाची क्षमता 21.50 टीएमसी असून सध्या 80 टक्के पाणीसाठा आहे.
हतनूरची क्षमता 9 टीएमसी असून सध्या 58 टक्के पाणीसाठा आहे.
वाघूरची क्षमता 8.76 असून सध्या 57 टक्के पाणीसाठा आहे.
करंजवणची क्षमता 5.37 असून सध्या 66 टक्के पाणीसाठा आहे.
गंगापूरची क्षमता 5.61 आहे त सध्या धरणात 91 टक्के पाणीसाठा आहे.
गिरणाची क्षमता 18.50 टीएमसी असून सध्या 37 टक्के पाणीसाठा आहे.
दारणाची क्षमता 7.13 असून सध्या 96 टक्के पाणीसाठा आहे.
मुकणेची क्षमता 7.24 असून सध्या धरणात 78 टक्के पाणीसाठा आहे.
*अमरावती विभाग*
अमरावती विभागातील उर्ध्व वर्धाची क्षमता 19.91 असून सध्या 90 टक्के पाणीसाठा आहे.
अरूणावतीची क्षमता 6 टीएमसी असून सध्या पाणीसाठा 87 टक्के आहे.
इसापूरची क्षमता 34.3 टीएमसी असून सध्या 68 टक्के पाणीसाठा आहे.
बेंबळाची क्षमता 6.49 असून सध्या 50 टक्के पाणीसाठा आहे..
*नागपूर विभाग**
नागपूर विभागातील गोसीखुर्द धरणाची क्षमता 26.12 आहे तर सध्या धरणात 55 टक्के पाणीसाठा आहे.
इटियाडोह धरणाची क्षमता 11.23 टीएमसी असून सध्या 80 टक्के पाणीसाठा आहे.
सिरपूर धरणाची क्षमता 5.65 असून पाण्याचा साठा 70 टक्के आहे.
कामठी खैरी धरणाची क्षमता 5.1 टीएमसी असून धरणात सध्या 100 टक्के पाणीसाठा आहे.
तोतलाडोहची क्षमता 35.90 टीएमसी असून धरणात सध्या 97 टक्के पाणीसाठा आहे.
दरम्यान, देशातील महत्वाच्या जलाशयांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर आहे. सध्याचा पाणीसाठा 10 वर्षांमधील निचांकी पातळीवर पोहोचला आहे. तर महत्वाच्या 23 जलाशयांमधील पाणीसाठा 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे. मोठ्या जलाशयांमधील पाणीसाठा कमी असल्याने पिकांच्या सिंचनाची समस्या निर्माण होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.