पोलिसांची सोशल मीडियावर नजर : शहरात संवेदनशील परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त
नगर – आयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला आहे. निकाला आज झाला असला, तरी उद्या मुस्लिम समाज ईद-ए-मिलाद साजरी करत आहे. त्यामुळे शहरात कोणताही अनुचित प्रकार घडुनये म्हणून, मोठा बंदोबस्त ठेवला आहे. तसेच नगर सायबर सेल सोशल मीडियावर नजर ठेवून, राम मंदीरासंदर्भात कोनताही मेसेज किंवा स्टेटस दिसल्यास तत्काळ त्या व्यक्तीला फोन करून, ते हटवण्याची सांगितले जात आहे.
मेसेज हटवले नाही. तर लगेच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच पोलिसांनी ड्रोनची मदत घेतली असून, शहरातील चौकाचौकातून हे ड्रोन फिरवून संशयित व्यक्तिंवर लक्ष ठेवले जात आहे.आयोध्याच्या निकालामुळे नगर शहरात गेल्या आठवड्यापासून पोलिसांचा बंदोबस्त आहे.
काही ठिकाणी शस्त्रधारी बंदोबस्त आहे. रबरी गोळ्या आणि अश्रूधुरांचा मारा करणारे रुद्र देखील पोलिसांनी शहरातील चितळेरोडवर उभे केले आहे. सर्जेपुरा, तेलीखुंट, रामचंद्र खुंट, कापडबाजार, चितळे रोड, नवीन टिळक रोड, सर्जेपुरा, बागडपट्टी, माळीवाडा परिसर, सावेडी, केडगाव, भिंगार शहरातील मोमीन गल्ली, भिंगार वेश, गवळी वाडा, खळेवाडी, आंबेडकर नगर, मुकुंदनगर परिसर आदी भागात पोलीस बंदोबस्त आहे.दरम्यान शहरात काहीसा तणाव पूर्ण शांतता आहे.
नगर शहरातील बंदोबस्ताचे वैशिष्ट म्हणजे पोलिसांनी संशयितांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला आहे. सकाळी आणि सायंकाळी हे ड्रोन शहरावरून घिरट्या घालत राहणार आहे. रस्त्यावरील चौकात गर्दी दिसल्यास हे ड्रोन तेथेच घिरट्या लावून गर्दीचे चित्रीकरण करणार आहे. समाजकंटकांवर करडी ठेवली जात आहे. शहरात पोलिसांचा हा बंदोबस्त आज, उद्या ईदच्या दिवशी आणि परवा ईदनंतर देखील नियोजीत केला आहे. बंदोबस्ताच्या सूक्ष्म आराखडा आहे. मात्र, त्याची माहिती फक्त वरिष्ठ पोलिसांकडेच आहे.
जास्त अफवा ह्या सोशल मीडियावर माध्यमातून पसरतात म्हणून सायबर सेल ने एक पथक तयार केले आहे. असंवेदनशील मॅसेज, व्हॉटस ऍप स्टेटस, फेसबुक पोस्ट, ट्विटर, इन्सटाग्रामवर पोलिसांचे बारीक लक्ष ठेवण्यात आले. असंवेदनशील पोस्ट आढळल्यास त्वरीत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
संवेदनशील भागात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असुन, पोलीसांची काही पथके पेट्रोलिंग, महामार्गावर नाकाबंदी करण्याचे पोलीस अधीक्षक इशु सिंधू यानी सांगितले. राम जन्मभूमीचा निकालाच्या पार्श्वभूमीवर शरहात शांतता राहावी म्हणून पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठक घेऊन सुचना दिल्या होत्या. तर संवेदनशील भागातील समाजकंटकांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या होत्या.