नगर – अकोले तालुक्यातील पंचायत समितीची विनाकारण बदनामी करून अधिकारी व सदस्य यांना वेठीस धरणाऱ्याचे काम जिल्हा परिषदेच्या सदस्य व त्यांचे पती करीत आहेत,असा आरोप असे पंचायत समितीच्या सभापती सौ रंजना मेंगाळ व सर्व सदस्यांनी केला असून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यांचे वरील आरोपही खोटे असलेचे मत व्यक्त केले आहे.
नगर येथे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सभापती मेंगाळ यांचे सह सदस्य दत्तात्रय देशमुख, दत्ता बोऱ्हाडे, नामदेव आंबरे, देवराम सामेरे, माधवी जगधने, उर्मिला राऊत, अलका अवसारकर, सीताबाई गोंदके, सारिका कडाळी आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, अकोले पंचायत समितीचे कारभारावर जिल्हा परिषद सदस्या सुषमा दराडे व त्यांचे पती बाजीराव दराडे यांनी बदनामी सुरू केली आहे तशी वस्तुस्थिती नसून अकोले तालुका पंचायत समितीचा कारभार अतिशय सुरळीत चालू असून जिल्हा परिषदच्या सदस्या सुषमा दराडे यांनी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांना वेठीस धरले असून त्यांचे पती अधिकाऱ्यांना दमदाटी देऊन खोटे नाटे कामे करावयाला भाग पडतात न केल्यास त्या कर्मचाऱ्यांना चौकशी व निलंबित करण्याची धमकी देत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दराडे यांनी केलेले आरोप धादांत खोटे असून केळी रुम्हणवाडी, तिरडे येथील ग्रामपंचायतच्या कारभाराची चौकशी सुरू आहे तर राजूर, आंबेवंगण, शेणीत, बारी या ग्रामपंचायत च्या ग्रामसेवका विरुद्ध दप्तर गहाळ केले बद्दल राजूर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर अबीतखिंड, पळसुंदे, कोतुळ ग्रामपंचायतिच्या तत्कालीन ग्रामसेवका विरोधात प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित आहे.
नगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई यांच्यावर केलेले आरोपही खोटे असून अध्यक्षा यांनी सर्व चौकश्या नियमानुसार सुरू केली आहे त्यामुळे त्यांची बदनामी वैयक्तिक द्वेषातून केले आहेत. त्याचाही या पत्रकात निषेध केला आहे. अकोले पंचायत समितीचे कारभार नियमाप्रमाणे सुरू असून गटविकास अधिकारी यांचा कारभार चांगला आहे.नाहक बदनामी केली जात आहे, असे मेंगाळ म्हणाल्या.