मुंबई – विविध प्रकरणांच्या याचिका कोर्टात दाखल करत कोर्टाबाहेर थेट राजकीय भूमिका घेणारे वादग्रस्त वकील गुणरत्न सदावर्ते यांची वकिली दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आली आहे. बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी सदावर्ते यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली होती. त्याद्वारे सदावर्ते यांची वकिली दोन वर्षांसाठी रद्द करण्यात येणार होती. त्याविरोधात सदावर्ते उच्च न्यायालयात पोहोचले. मात्र न्यायालयाने त्यांना फटकारल्याचं समोर आलं आहे. एका प्रसिद्धीवृत्तवाहिनीने याबद्दल माहिती दिली आहे.
झालं असं की, सदावर्ते यांची भाषा आक्रमक आणि आवाज मोठा असल्यामुळे न्यायमूर्ती पटेल यांनी त्यांना दोन वेळा समज दिली. मात्र, शेवटी हायकोर्टाने सदावर्ते यांना खडसावताना म्हटलं की, तुम्ही प्रेससमोर नाहीत, तर कोर्टात दाद मागायला आलात याचं भान राखा. अश्या शब्दात त्यांना खडसावलं आहे. यावेळी सदवर्ते म्हणाले, “मीडिया आणि प्रेस माझी बदनामी करत आहेत. तसेच सनद दोन वर्षांसाठी रद्द झाल्याने त्याची दादत सदावर्ते यांनी यावेळी न्यायालयात मागितली.
राज्यातील मराठा आरक्षण आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांसमोर आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. सदावर्ते यांच्याविरोधात बार कौन्सिलमध्ये तक्रार करण्यात आल्यानंतर बार कौन्सिलने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली होती. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयानेही सदावर्तेंना दिलासा न दिल्यामुळे त्यांना पुढील दोन वर्ष वकिली करण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे.