रांची – देशातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉक डाऊनचा दुसरा टप्पा लागू करण्यात आला आहे. लॉक डाऊनमुळे अनेक नागरिक परराज्यात अडकून पडले असून केंद्र सरकारतर्फे राज्यांतर्गत प्रवासास मंजुरी देण्यात आल्याने त्यांच्या राज्य वापसीचा मार्ग आता जवळपास मोकळा झालाय.
अशातच आज झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी परराज्यात अडकलेल्या झारखंडच्या नागरिकांसाठी एक महत्वपूर्ण संदेश दिला आहे. ‘परराज्यात अडकलेले मजूर, विद्यार्थी, यात्रेकरू या सर्वांना राज्यामध्ये परत आणले जाणार असून कोणीही भीती बाळगण्याचे कारण नाही. प्रशासन लवकरच तुमच्याशी संपर्क साधणार असल्याने कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नाही’ असा संदेश सोरेन यांनी दिला आहे.
तत्पूर्वी, आज पहाटे ५ च्या सुमारास तेलंगणाच्या लिंगमपल्ली येथून रांचीला एक ट्रेन रवाना झाली. २४ डब्यांच्या या रेल्वेमध्ये १२०० प्रवाशी लॉक डाऊनचे नियम पाळत झारखंडकडे रवाना झाले.