मुंबई: अजितदादांनी पारनेरचे ‘ते’ पाच नगरसेवक मिलिंद नार्वेकरांकडे सोपवले या शीर्षकाची बातमी वाचली. सेनेतून राष्ट्रवादीमध्ये आलेले, आता पुन्हा सेनेकडे… नगरसेवक म्हणजे कूरिअरवाल्याकडचे ‘पार्सल’ आहे का, एकाकडून दुसऱ्याकडे सोपवायला? असा प्रश्न भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.
राज्यात महविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येण्यापूर्वीच पारनेर नगरपंचायतीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसने जवळीक साधत सत्ता स्थापन केली होती. मात्र पारनेर’चे शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रवादीत गेल्यानंतर शिवसेनेत तीव्र नाराजी उमटली होती. शिवसेना नेत्यांकडून आमचे नगरसेवक परत करा. असा निरोप देखील अजित पवारांना पाठवल्याची चर्चा होती.
या पाचही नगरसेवकांनी काल बुधवारी मुंबईत मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. या संपूर्ण प्रकरणात शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी मोलाची भूमिका बजावल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांना भेटण्यापूर्वी नार्वेकर आणि नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती.
अजितदादांनी पारनेरचे ‘ते’ पाच नगरसेवक मिलिंद नार्वेकरांकडे सोपवले या शीर्षकाची बातमी वाचली. सेनेतून राष्ट्रवादीमध्ये आलेले, आता पुन्हा सेनेकडे… नगरसेवक म्हणजे कूरिअरवाल्याकडचे ‘पार्सल’ आहे का, एकाकडून दुसऱ्याकडे सोपवायला..?? @PTI_News pic.twitter.com/jo2yy8k8B8
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 8, 2020