नवी दिल्ली- केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले असून 26 नोव्हेंबर रोजी या आंदोलनाला सुरुवात झाली. गेल्या अनेक दिवसांपासून हे शेतकरी दिल्लीच्या वेशीवर तळ ठोकून आहेत. आंदोलना दरम्यान केंद्र सरकारसोबत शेतकऱ्यांची पाच वेळा बैठक झाली. मात्र, अद्यापही तोडगा निघाला नाही.
शेतकऱ्यांच्या या आंदोलनावरून कलाक्षेत्रात देखील अनेक वाद रंगले आहेत. काही बॉलिवूड सेलिब्रिटींसह हॉलिवूडच्या सेलिब्रिटींनीही या आंदोलनाला पाठींबा दिला असून, आता आणखी एक अभिनेत्री शेजाऱ्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरली आहे.
View this post on Instagram
बॉलिवूडची दबंग गर्ल म्हणजेच अभिनेत्री ‘सोनाक्षी सिन्हा’ने आपल्या सोशल मीडियावर एक कविता शेअर करत या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. कविता सोनाक्षीच्या आवाजात आहे आणि सोबत शेतकरी आंदोलन स्थळीची दृश्य आहेत. “ये तुम्हें दंगे वाले लगते हैं? असा सवाल या माध्यमातून तिने केला आहे. ही कविता वरद भटनागरने लिहिलेली आहे.