मुंबई – बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना राणावत सध्या ट्विटरवर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. शेतकरी आंदोलनावरून भारत सरकार ट्विटरवर चांगलाच वाद पेटला आहे. अशातच कंगनाने ट्विटरला बॅन करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
कंगना म्हणाली कि, आदरणीय पंतप्रधानजी, जी चूक महान योद्धा पृथ्वीराज चौहान यांनी केली होती. ती चूक तुम्ही करू नका. त्या चुकीचे नाव होते ‘क्षमा’. ट्विटरने कितीही क्षमायाचना करू दे, तुम्ही क्षमा करू नका. त्यांनी भारतात गृहयुद्धाचा कट रचला, अशी तिने म्हंटले आहे.
Honourable Prime Minister ji jo galti Great warrior Prithaviraj Chauhan ji ne ki thi woh bilkul mat karna …. uss galti ka naam tha maafi…@Twitter kitni bhi maafi mange bilkul maaf mat karna. They conspired for a civil war in India. #BanTwitterInIndia
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 11, 2021
कू अॅपचे कौतुक करत कंगना म्हणाली कि, ट्विटर तुमची वेळ संपली आहे , आता कू अॅप वर शिफ्ट होण्याची वेळ आली आहे. आपल्या देशाने बनवलेल्या कू अॅपचा वापर करण्यासाठी मी उत्साहित आहे.
Your time is up @Twitter time to shift to #kooapp will inform everyone soon about my account details there.
Absolutely thrilled to experience home grown #kooapp https://t.co/Kdm0TISCmR— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 10, 2021
दरम्यान, कंगनाने जर शेतकऱ्यांविरुद्ध केलेल्या ट्विटबद्दल माफी मागितली नाही. तर ‘धाकड’ चित्रपटाची शूटिंग बंद पडण्याचा इशारा मध्यप्रदेश काँग्रेसने दिला आहे.