Cardamom । वेलदोड्यासारखा सुगंधी मसाल्याचा जिन्नस भारत, श्रीलंका, टांझानियात उगवतो. त्याचा वापर पदार्थांना स्वाद यावा तसेच वैद्यकीय कारणांसाठी केला जातो. भारतात सुगंधी मसाले प्रामुख्याने तमिळनाडू, कर्नाटक आणि केरळमध्ये पिकतात. भारतीय वेलदोडा आजही जगावर राज्य करतो. भारतीय वेलदोड्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक ‘मलबार वेलदोडा’ आणि दुसरा ‘म्हैसूर वेलदोडा.’ यातील म्हैसूर वेलदोडा त्याच्या प्रखर गंधामुळे सर्वोत्तम मानला जातो. वेलदोडा केशराखालोखाल महाग असतो. भारतात होणाऱ्या वेलदोड्याच्या उत्पादनापैकी 50% उत्पादन हे निर्यात केले जाते. जगाची वेलदोड्याची बहुतांश मागणी भारताकडून पूर्ण केली जाते.
मिरीला मसाल्यांची राणी मानले जाते, तर वेलदोड्याला मसाल्यांचा राजा. भारतीय सणांकरता वेलदोडायुक्त तिखट-गोड पदार्थ तयार केले जातात. वेलदोडायुक्त श्रीखंड, बासुंदी, खीर, करंजी, लाडू, पुरणपोळी या सर्व गोड पदार्थात वेलदोड्याचा वापर सढळ हस्ते केला जातो. जायफळ, केशर असे सुगंधी मसाले असले, तरी वेलदोडा मात्र जोडीला हवा. भारतीय मसाल्यांची मोहिनी संपूर्ण जगावर आहे. त्यातही मिरी, वेलदोडा असे काही विशेष मसाले त्यांच्या स्वाद आणि गंधामुळे फारच भाव खाऊन जातात.
कारखान्यांमध्ये वेलदोडा कसा तयार होतो ? Cardamom ।
वेलदोडा हा भारतात अतिशय लोकप्रिय आहे आणि त्याचा वापर चहा करताना तसेच विविध प्रकारची आमटी करताना केला जातो. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला हो.ता त्यामध्ये मसाल्याचे लोकप्रिय पदार्थ बाजारपेठेत कसे विकले जातात हे दाखवण्यात आले होते. त्या व्हिडिओमध्ये वेलदोडे झाडावरून कसे तोडले जातात हेही दाखवण्यात आले होते. त्यानंतर ते वाळवून मशीनमध्ये टाकले जातात. त्या ठिकाणी ते पूर्णपणे धुतले जातात. एकदा का वेलदोडे धुवून स्वच्छ झाल्यानंतर घाण पाणी मशीन मधून बाहेर पडते आणि मग हे वेलदोडे एका भट्टीत टाकून कोरडे केले जातात.
एकदा का वेलदोडे सुकले की त्याचे बाहेरचे आवरण कठीण होते शेवटी. हे वेलदोडे अन्य कामगारांकडे जातात आणि मग तिथे त्याची प्रतवारी केली जाते प्रतवारीनंतर वेलदोडे बाजारपेठेत पाठवले जातात.
वेलदोडे पिकवण्यापासून ते तोडल्यानंतर त्याच्यावरची प्रक्रिया आणि ते बाजारपेठेत पाठवणे ही सगळी प्रक्रिया अतिशय अवघड असते आणि त्यासाठी अनेक कामगारांचे कष्ट असतात. असे असूनही या कामगारांना पुरेसा मोबदला मिळत नाही असे या व्हिडिओमध्ये म्हटले होते. अर्थात कुठल्याही शेतमालाबाबत ही वस्तुस्थिती आहे हे मान्य करावे लागते.