सातारा, (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेला संकल्पना जाहीरनामा संपूर्ण जनतेच्या आशा आकांक्षाचा संकल्प आहे. या संकल्पनाम्यामध्ये भारत जागतिक दर्जाची महाशक्ती कशी होईल याचे प्रयत्न असणार आहे, भारतात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी प्रक्रिया सुरू असून त्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी वचनबद्ध आहे अशी माहिती महाराष्ट्र भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार ,शहराध्यक्ष विकास गोसावी, कार्यकारणी सदस्य राहुल शिवनामे इत्यादी यावेळी उपस्थित होते
माधव भंडारी म्हणाले, ” गेल्या पंधरा वर्षापासून मी जाहीरनामा समितीचा प्रमुख आहे. भारतामध्ये पंधराशे सूचना पेट्या तर महाराष्ट्रामध्ये 10 विभागातून आम्ही साडेसातशे सूचना पेट्या ठेवल्या होत्या. यामध्ये महाराष्ट्रातून एक लाख वीस हजार सूचना प्राप्त झाल्या. या सूचनांचा अभ्यास आणि एकत्रीकरण करून जनतेचे संकल्प पत्र तयार करण्यात आले आहे.
यामध्ये देशाची संरक्षण सिद्धता अर्थव्यवस्था उद्योग रोजगारांना चालना शेती सुधार इत्यादी मुद्द्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या संकल्प पत्रामध्ये स्टार्टअप इकोसिस्टीम आणि फंडिंगचा विस्तार स्टार्टअप च्या मार्गदर्शनाकरता सरकारी खरेदीमध्ये स्टार्टर योजनांना प्रोत्साहन, रोजगाराच्या अधिक संधी पायाभूत क्षेत्रांचा विस्तार आणि वाढत्या रोजगार संधी औद्योगिकरणाला प्राधान्य या मुद्द्यांना प्राधान्य आहे.
शेतकऱ्यांसाठी 22 पिकांच्या आधारभूत किमती, वाढवणे संशोधन आणि जागरूकता यांना चालना, सहकार क्षेत्रात धान्य साठवून घेऊन अंतर्गत प्राथमिक कृषीपत सोसायटी यांच्या माध्यमातून साठवणूक क्षमतांचा विस्तार, महिलांसाठी तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार बचत गटांचा विस्तार आणि त्यांना बाजारपेठ मिळून देणे,
औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रात महिलांसाठी बालगृहासारखा मूलभूत सुविधांचा प्रकल्प उभा करणे, नारीशक्ती वंदन अधिनियमाची अंमलबजावणी, रेल्वेसाठी पाच हजार किलोमीटरचे नवे रेल्वे मार्ग बांधणार ,वंदे मातरम सारख्या अनेक रेल्वे सुरू करण्यात येणार,धर्म आणि संस्कृती क्षेत्रात काशी विश्वनाथच्या धरतीवर देशातील ठिकठिकाणी धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांचे कॉरिडॉर विकसित करणार याशिवाय भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 44 मध्ये राज्य नीति अंतर्गत समान नागरी कायद्याची मार्गदर्शक तत्त्व म्हणून नोंद केलेली असल्याचे त्यांनी सांगितले.
समान नागरी कायदा आणण्यासाठी भाजप कटिबद्ध
भारतात समान नागरी कायदा येत नाही तोवर महिलांना समान अधिकार मिळणार नाहीत. त्यामुळे सर्वोत्तम परंपरांचे पालन करताना अधिक आधुनिक काळाच्या आवश्यकतेनुसार नवे रूप देणारा समान नागरी कायदा आणण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे, असे भंडारी यांनी सांगितले.
भारतीय सांस्कृतिक स्थळांच्या स्मारकांचे पुनर्जीवन भारताच्या सांस्कृतिक वारशाचा विकास योग आणि आयुर्वेदाचा जगभर प्रसार डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरचा जगभर विस्तार इत्यादी महत्त्वाच्या तरतुदींचा संकल्पना यामध्ये समावेश करण्यात आल्याचे भंडारी यांनी सांगितले.