आजी माजी सैनिक संघटनेचा पाठींबा
चिखली – देशाच्या संरक्षणासाठी राष्ट्रहिताचे काम गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी केले आहे. भारताची वेगळी ओळख जगात त्यांनी केली. राष्ट्रहिताच्या विचारामागे आपण राहिले पाहिजे, असे आवाहन महायुतीचे शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांनी केले.
चिखली येथील पर्ल बॅंक्वेट हॉल येथे महाविजय निर्धार मेळावा संपन्न झाला. त्यावेळी श्री भैरवनाथ आजी-माजी सैनिक संघटना आणि जिजाऊ सैनिक महिला संघटना, ईगल वॉरियर्स फाउंडेशन यांच्या वतीने आढळराव यांना या निवडणूकीत पाठींबा देण्यात आला.
यावेळी श्री भैरवनाथ आजी-माजी सैनिक संघटना सचिव अनिल लंघे,
जिजाऊ महिला संघटना अध्यक्ष सुवर्णाताई पडवळ, पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष पोकळे, अपूर्व आढळऱाव पाटील, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, युवा उद्योजक विठ्ठल मिंडे, कवठे येमाईचे सरपंच किसन हिलाळ, ग्रामपंचायत सदस्य मालुबाई मुंडे, बाबासाहेब लंघे, अँड अविनाश लंघे, आदींसह आजी -माजी सैनिकांचे कुटुंबीय उपस्थित होते.
यावेळी लंघे यांनी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. सुभाष पोकळे यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीकास्त्र सोडले. आढळराव पाटील यांनी नेहमी समाजाचा विचार केल्याचे त्यांनी नमूद केले.