पुणे – पिंपरीतील गुन्हेगार अविनाश धनवे याच्या खून प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. हे चारही गुन्हेगार प्रतिस्पर्धी टोळीतील आहेत. परिसरातील वर्चस्व वादातून हा खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
शिवाजी बाबुराव भेंडेकर ( ३५), मयुर ऊर्फ बाळा मुकेश पाटोळे (२० ), सतिश ऊर्फ सला उपेंद्र पांडे ( २०, सर्व रा. आळंदी देवाची), सोमनाथ विश्वंभर भत्ते ( २२ सोळू, ता. खे ) इंदापूर शहरास लागून असलेल्या महामार्गावरील हॉटेल जगदंब येथे शनिवारी रात्री पिंपरीतील गुन्हेगार अविनाश बाळु धनवे ( ३१, रा. चन्होली बुरा, वडमुखवाडी, ता. हवेली जि.) याचा गोळ्या झाडून खून करण्या आला होता.
धनवे हा बंटी ऊर्फ प्रणिल मोहन काकडे, राजु एकनाथ धनवडे, राहुल एकनाथ धनवडे यांचे सोबत जेवण करण्यासाठी थांबलेला होता. जेवणाची ऑर्डर देवून चौघेही टेबलवर बसलेले असताना आठ जणांचे टोळके हातात पिस्तुल व कोयता घेवून आले. त्यांनी हॉटेलमध्ये बसलेल्या अविनाश धनवे याचेवर पिस्तूल मधून गोळीबार केला व कोयत्याने त्याचेवर वार करून त्याचा जागीच खून केला. त्यावेळी धनवेसोबतचे तीन मित्र हे त्या ठिकाणाहून पळून गेले. याप्रकरणी धनवे याची पत्नी पुजा धनवे हिने इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता, हा गुन्हा दोन गुन्हेगार टोळीतील पुर्ववैमन्यसातून झाला असल्याचे निष्पन्न झाले. मयत अविनाश बाळू धनवे याची चऱ्होली परिसरात दहशत होती. तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार होता. त्याचे आळंदी परिसरातील स्थानिक गुन्हेगार टोळी सोबत वैमनस्य असल्याने त्याचा खून त्याचे विरोधी टोळीनेच केला असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली.
त्या दुष्टीने तपास करता, गुन्हयातील आरोपी हे कोल्हापूरकडे पळून जात असल्याची खबर मिळाली होती, तांत्रिक विश्लेषणाचे आधारावर आरोपींना पुणे कोल्हापूर महामार्गावरील शिंदेवाडी गावचे परिसरातून ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर यापुर्वी खुन, खुनाचा प्रयत्न, मारामारी असे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
ही कामगिरी अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे , सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, कुलदीप संकपाळ यांच्या पथकाने केली.