नवी दिल्ली : देशात 3 महिन्यांपर्यंत सुमारे 20 कोटी कुटुंबाना प्रत्येकी 1 किलो डाळ वितरीत करण्यासाठी डाळींची वाहतूक आणि गिरण्यांचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या संकटांच्या काळात लोकांच्या प्रथिनांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने (पीएमजीकेएवाय) अंतर्गत तीन महिन्यांसाठी एनएफएसए कुटुंबांना प्रत्येकी 1 किलो भरडलेली आणि स्वच्छ डाळ देण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या मार्गदर्शनखाली नाफेड ही मोहीम राबवीत आहे, या मोहिमेंतर्गत न-भरडलेली डाळ केंद्र/राज्य वखार महामंडळाच्या गोदामामधून उचलून, एफएसएसएआयच्या गुणवत्ता प्रमाणानुसार डाळ भरडली किंवा स्वच्छ केली जाते आणि नंतर ही भरडलेली डाळ राज्यांपर्यंत पोहोचवली जाते. त्यांनतर, ही भरडलेली डाळ वितरणासाठी आधी राज्य सरकारच्या गोदामांमध्ये आणि नंतर शिधावाटप दुकानांमध्ये आणली जाते.