नवी दिल्ली – आयपीएल 2023 च्या सहाव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने लखनौ सुपरजायंट्सचा 12 धावांनी पराभव केला. चेन्नईच्या फास्ट बॉलर्सनी भरपूर धावा दिल्या. यात नो बॉल-वाइडचाही मोठा वाटा होता. चेन्नईच्या गोलंदाजांनी 13 वाइड आणि तीन नो बॉल फेकले. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात आलेल्या तुषार देशपांडेने तिन्हीनो नो बॉल टाकले. यादरम्यान महेंद्रसिंह धोनीने तुषारला सीएसकेचे कॅप्टन पद सोडण्याची धमकी देखील दिली.
आपण बॉलरला दोन वॉर्निंग दिल्याचा खुलासा धोनीने मॅचनंतर बोलताना केला. तो म्हणाला,वेगवान गोलंदाजीत आम्हाला थोडी सुधारणा करावी लागेल. आमच्या वेगवान गोलंदाजांना परिस्थितीनुसार गोलंदाजी करणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे विरोधी गोलंदाज काय करत आहेत हे पाहणे, त्यामुळे आमचे वेगवान गोलंदाज काय करू नये हे शिकू शकतात. त्यासोबतच धोनी म्हणाला मी दुसरी वॉर्निंग ही दिली की,नो बॉल्स किंवा एक्सट्रा वाईड टाकायचे असतील तर दुसऱ्या प्लेअरचे कॅप्टन्सीमध्ये खेळण्याची तयारी ठेवा. असं धोनीने यावेळी सांगितले.
चैन्नईने हा सामना जरी जिंकला असला तरी यामध्ये बॉलरचे प्रदर्शन चांगलेच खराब राहिले आणि यावरूनच धोनीने आपल्या प्लेअरला कॅप्टन्सी सोडण्याचा इशारा दिला. धोनीच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडिया आणि संपूर्ण क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. लखनौविरुद्ध चेन्नईचे वेगवान गोलंदाज चांगलेच महागात पडले.
#CSK bowlers today bowled 13 wides and 3 no balls against #LSG and Captain @msdhoni, in his inimitable style, had this to say. 😁😆#TATAIPL | #CSKvLSG pic.twitter.com/p6xRqaZCiK
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2023
काय घडलं मॅचमध्ये?
प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी 110 धावांची भागीदारी केल्याने चांगली सुरुवात झाली. ऋतुराज 31 चेंडूत 57 धावा करून बाद झाला आणि कॉनवेने 29 चेंडूत 47 धावा केल्या. यानंतर शिवम दुबेने 16 चेंडूत 27 धावांची खेळी केली. मोईन अलीने 13 चेंडूत 19 धावा केल्या. वीस ओव्हरमध्ये सीएसकेने 217 धावांचा डोंगर उभा केला.
प्रत्युत्तरात लखनौनेही चांगली सुरुवात केली. कर्णधार केएल राहुल आणि केन मायर्स यांनी पहिल्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी मोईन अलीने मोडली. त्याने मायर्सला बाद केले. मायर्स 22 चेंडूत 53 धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार केएल राहुल 18 चेंडूत 20 धावा करून बाद झाला. चैन्नईच्या हातात असेलेली मॅच केवळ बॉलरच्या खराब कामगिरीमुळे निसटणार का असं वाटत होत. मात्र अखेर चैन्नईने बाजी मारली आणि बारा धावांनी सामना जिंकला.