नगर (प्रतिनिधी) -जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्ज माफी होत नाही. शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होत नाही. तोपर्यंत शेतकरी आत्महत्या थांबनार नाही. महाविकास आघाडीचे सरकार फसवे आहे. त्याचा प्रत्येय पाथर्डी तालुक्याल शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने समोर आला आहे. तसेच या कर्जमाफीमध्ये अनेक अटीशर्ती असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही असे, विरोधी पक्षनेते प्रवीन दरेकर यांनी म्हटले आहे.
पाथर्डी तालुक्यातील भरजवाडीच्या आत्महत्या ग्रस्त कुटुंबाची विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी नगर येथील शासकीय विश्राम गृह येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार मोनिका राजळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे आदीसंह कार्यकर्ते उपस्थित होते.
महाविकास आघाडीने दिलेली फसवी कर्जमाफी यादीत आज पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांचे नाव आले असते तर त्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आली नसती. त्यामुळे सार पाप हे माहाविकास आघाडीचे आहे असा आरोप दरेकर यांनी केला. देवेंद्र फडणवीस सरकार ने गेल्या पाच वर्षांत कर्जमाफी दिली. तसेच दीड लाखावरील कर्ज माफी दिली. तसेच सिंचनासाठी अनेक योजना, शेतकऱ्यांना शेतीच्या साधनासाठी आर्थिकदृष्ट्यी प्रबल करण्याऱ्या योजना आनल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्याना कितीही कर्ज माफी केली तरीही शेतकरी आत्महत्या होणारच. त्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पन्नापेक्षा दीडपट हमी भाव दिला पाहिजे.
तेव्हा शेतकरी आत्महत्या थांबतील.
पालकमंत्र्यांनी फिरविली पाठ
आज आत्महत्या होवून दोन दिवस झाले आहे. या कुटुंबियांच्या सात्वनासाठी ना सरकारचा प्रतिनिधी आला, ना पालकमंत्री, ना राज्याचा एकही मंत्री फिरकला नाही. कारण त्यांना या घटनेचे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. केवळ एका बाजूला बळीराज्याच्या हिताच्या गोष्टीकरायच्या फक्त. त्यांच्याकडे सरकारला पहायला वेळ नाही. ही खेदाची गोष्ट आहे. हे सरकार असंवेदनशील असून अजून कोणी मदतीला आले नाही, आता मी आल्यानंतर उद्यापासू सगळे येतील, अशी टीका महाविकास आघाडीच्या सरकारवर केली.
नुकसानग्रस्तांना त्वरित मदत करा
जिल्ह्यात मधील अनेक गावात आज अवकाळी पाऊस झाला आहे. गेल्याच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाही. आज पुन्हा अवकाळी पाऊस झाला आहे. याबाबत यासरकारने त्वरीत शेतकऱ्यांना मदत करावी याबाबत आम्ही विधीमंडळात मांडणार आहेत.
तीनही मुलांचा शिक्षणाचा खर्च करणार भाजप
पाथर्डी तालुक्यातील मल्हार बटुळे या आत्महत्या ग्रस्त कुटुंबियांच्या तिन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी भाजप आमदार राजळे यांचेमार्फत घेतली असून त्यांना भाजप पक्षाकडून 1 लाख रुपये देण्यात आले आहे.