मुंबई – भारतीय चित्रपटाचा इतिहास 100 वर्षांहून अधिक जुना आहे. अभिनेता, लेखक, दिग्दर्शकांसह इतर अनेकांच्या योगदानामुळेच आज हिंदी चित्रपटांची परदेशातही चर्चा होत असते. जगातील विविध देशांमध्ये भारतीय सिनेमा पाहिला जातो. मीना कुमारी यांनीही हिंदी चित्रपटसृष्टीत महत्त्वाचे योगदान दिले आहे. मीना कुमारी व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्याही खूप चर्चेत आले होते.
अशात आता त्यांच्या बायोपिकची निर्मिती केली जात आहे, ज्याचे दिग्दर्शन डिझायनर मनीष मल्होत्रा करणार आहेत. दिग्गज अभिनेत्री मीना कुमारी यांच्या बायोपिकचे काम अखेर सुरू झाले आहे. चित्रपट सध्या स्क्रिप्टिंगच्या टप्प्यावर असून, त्यानंतर रेकी, कास्टिंग इत्यादी आणि त्यानंतर शूट सुरू होईल. या चित्रपटातून मनीष मल्होत्रा दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे. त्याचवेळी भूषण कुमार या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. क्रिती सेनन दिग्गज अभिनेत्री मीना कुमारीच्या भूमिकेत दिसणार आहे.
ट्रॅजेडी क्वीन म्हटल्या जाणार्या, मीना कुमारी यांना आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागला. मीना यांनी बळजबरीने काम करायला सुरुवात केली, त्यांना गरिबीमुळे अभ्यास करता आला नाही. वडिलांच्या भीतीने गुपचूप लग्न केले आणि लग्नानंतर पतीकडून त्यांना खूप मारहाण झाली. मीना कुमारी यांचे शेवटचे दिवसही खूपच वाईट होते. मीना हळुहळू नैराश्याची शिकार होऊ लागल्या, यानंतर त्यांना लिव्हर सिरोसिस झाला, ज्यावर परदेशात उपचार झाले पण त्या पूर्णपणे बऱ्या होऊ शकल्या नाही.