मुंबई – आजपासून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली एक कृती सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. फडणवीस यांच्या या साधेपणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.आदिवेशनाचा पहिला दिवस चांगलाच वादळी ठरला. अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आपापसात भिडल्यामुळे विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज उद्या सकाळपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
सध्या राज्यभर पावसाचे वातावरण आहे. अधिवेशन स्थळी देखील पाऊस पडत होता. यामुळे अनेक लोकप्रतिनिधी पावसातच सभागृहात दाखल होत होते. अशात सभागृहात जाण्यापूर्वी फडणवीस यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या डोक्यावर छत्री देखील धरली होती. मात्र फडणवीस यांनी पायातील बूट हातात काढून घेत अनवाणी पायाने चालणे पसंत केले आणि ते विधानसभेत पोहचले.
देवेंद्र फडणवीस यांच्या या कृतीचे चांगलेच कौतुक होताना दिसत आहे. बुट पाण्यात भिजू नये आणि बुटांना लागलेली घाण सभागृहात जाऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ही काळजी घेतली. फडणवीसांच्या या साधेपणाचे सर्वांनाच कुतुहूल वाटत आहे.
भाजप नेत्यांसह अनेकांना उपमुख्यमंत्र्यांचा हा साधेपणा खूपचं भावला आहे. आचार्य तुषार भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांचा या दरम्यानचा फोटो देखील ट्विट केला आहे. ‘नेता ‘संघ’ संस्कारांचा !’ असं कॅप्शन आचार्य भोसले यांनी यावेळी या फोटोला दिले आहे.
नेता ‘संघ’ संस्कारांचा !@RSSorg स्वयंसेवक @Dev_Fadnavis pic.twitter.com/kVWCisSnDU
— Acharya Tushar Bhosale (@AcharyaBhosale) July 17, 2023
काय झालं अधिवेशनात
आज विधान परिषदेत नीलम गोऱ्हे यांच्या पदावर विरोधकांनी आक्षेप घेतला. तेव्हा पॉईंट ऑफर ऑर्डर उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर उत्तर दिलं. विधानसभेतही बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केलेल्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं