तळेगाव ढमढेरे – महाराष्ट्राचे थोर विचारवंत आणि आमचे मार्गदर्शक नरके सरांशी माझा अनेक वेळा संबंध आला होता. वारकरी संप्रदायामध्ये आपण ग्रामीण भागातील मंडळी एवढे तल्लीन असतो, कारण वारकरी संप्रदाय खर्या अर्थाने आपल्या जीवनाचा सार्थक असणारा कार्य-कर्म असतो. सगळ्या गोष्टीत आपल्याला समाधान मिळते असे नाही; परंतु वारकरी संप्रदायामध्ये असताना चार शब्द आपल्या कानावर पडल्यानंतर आपण सगळे सुख-दु:ख विसरतो.
अशी भावना व्यक्त करत महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नरके सर यांच्या आठवणींना उजाळा दिला. शिरूर येथे गावभेट दौर्या दरम्यान नरकेवाडी (कासारी) येथे, मागील 29 वर्षापासून नियमित सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारोप प्रसंगी आढळराव पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.
याप्रसंगी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रवी बापू काळे, तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, भाजपा तालुकाप्रमुख आबा सोनवणे, महिला तालुकाध्यक्ष आरतीताई भुजबळ, युवा नेते राहुल दादा पाचर्णे, उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, भाजपा नेते जयेश शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस नेते स्वप्निल ढमढेरे, पुणे जिल्हा समन्वयक आण्णा हजारे, तालुका संघटक दत्ता गिलबिले,
पुणे जिल्हा सल्लागार रोहिदास शिवले, उपतालुकाप्रमुख गणेश कोतवाल, ओबीसी जिल्हाध्यक्ष कैलास नरके, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष रोहित खैरे, भाजपा नेते रवी ढमढेरे, शेतकरी सेना प्रमुख बाळासाहेब शेळके, संदीप आण्णा ढमढेरे, माजी उपसभापती यशवंत आबा ढमढेरे, घोडगंगा सहकारी साखर कारखाना माजी संचालक कैलास सोनवणे, युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुनील भुजबळ,
सुनील ढमढेरे, राजेंद्र गवारे, भाजपा प्रदेश सरचिटणीस नवनाथ भुजबळ, शाखाप्रमुख सुषमा गायकवाड, आरती ढमढेरे, उल्कानानी नरके, प्रमिला दरेकर, सुवर्णा भुजबळ, गीताताई यमुल, तृप्ती नरके, सोनाली मायने, दुर्गेश भुजबळ, योगेश आण्णा ढमढेरे, बाळासाहेब ढमढेरे, शंकरराव भुजबळ, सुखदेव भुजबळ, प्रकाश टिळेकर, विष्णुपंत नरके, जालिंदर भूमकर, विशाल नरके, विकास नरके, दत्ता भूमकर, सोनूबाई नरके, साळुबाई नरके, गोपाळ भुजबळ, नवनाथ नरके, गणेश नरके व महायुतीतील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आढळराव पाटील म्हणाले, वारकरी संप्रदायाचा खूप मोठा वारसा आपल्या पुणे जिल्ह्याला लाभला आहे. एका बाजूने छत्रपती शिवरायांची शिवभूमी, दुसर्या बाजूला संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर महाराज या सगळ्यांचे विचार आपल्या या भूमित पवित्र व पावन झाले आहेत.
मी गेल्या 15-20 वर्षांत कायमच आपल्या सेवेत आहे. कधीही खाडा केला नाही. कधीही आराम केला नाही. पाच वर्षे जरी मी पराभूत झालो तरी घर, प्रपंच सगळं सोडून आज मी तुमच्या समोर उभा आहे. या परिसरामध्ये अनेक विकासकामे करण्याची मला संधी मिळाली. आपल्या सर्वांचे आशीर्वाद यावेळी माझ्या पाठीशी राहतील, अशी माफक अपेक्षा व्यक्त करतो.
विकासाच्या मागे उभे राहा – कंद
नरकेवाडी परिसराचा सर्वांगीण विकास करण्याला आढळराव पाटील व दिवंगत माजी आमदार बाबुराव पाचुर्णे यांनी गती दिली. खर्या अर्थाने कासारी पायथ्यापासून ते तळेगाव पर्यंत जाणारा रस्ता असूद्या किंवा शिक्रापूरपासून ते नाक्यापर्यंत जाणारा रस्ता चिखलमय होता. पण दिवंगत माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी निधी दिल्यानंतर परत कधीही तिथे चिखल झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले नाही.
अशा पद्धतीने सर्वांगीण विकासाला गती देणार्या माणसांच्या म्हणजेच शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे रहावं, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि पीडीसी बँकेचे विद्यमान संचालक प्रदीप कंद यांनी यावेळी केले.