मुंबई ( Gram Panchayat elections )- राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रविवारी झालेल्या मतदानात प्राथमिक अंदाजानुसार 74 टक्के मतदान झाले. यावेळी सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले. या निवडणुकीत नागरिकांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळाला आहे.
यामध्ये तरुणांसह वृद्धांनीही पुढे येऊन मोठ्या प्रमाणात मतदान केले. या निवडणुकांचा मंगळवार, दि. 20 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंच, तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या.
त्यामुळे आज प्रत्यक्षात 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान झाले. प्राथमिक माहितीनुसार दुपारी 3.30 पर्यंत सरासरी 67 टक्के मतदान झाले होते. ( Gram Panchayat elections )