हिंगोली – मागे दोन तीन महीन्यापुर्वी एका सरपंचाने नोटांची उधळण करून अनोखे आंदोलन केले होते. गट विकास अधिकारी पैसे घेतल्याशिवाय सह्या करत नाही, सर्व सामान्य जनतेचे कामे खोळंबली होते, त्यामुळे एका तरुण सरपंचाने पैशाची उधळून करून अनोखे आंदोलन केले होते.. आज हिंगोलीत देखिल एका तरुण युवकाने जिल्हा कृषी कार्यालयात पैश्यांची उधळण केली आहे..
हिंगोली जिल्ह्यातील बोगस कीटकनाशके विकणाऱ्या कंपन्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी (दि. 22) रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाच्या परिसरात पैश्यांची उधळण करून अनोखे आंदोलन केले आहे.
हिंगोली जिल्ह्यात आंध्रप्रदेशातून काही कंपन्या बनावट जैविक औषधी बाजारात विकत आहेत.. मात्र यावर जिल्हा कृषी अधिकारी काहीच कार्यवाही का करत नाहीत? असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हा अध्यक्ष नामदेव पतंगे यांनी केला आहे. जिल्ह्यात आलेल्या कीटकनाशकाचे नमुने तपासणीसाठी घेऊन प्रयोगशाळेत पाठवावेत, त्यानंतर अप्रमाणित असलेल्या कंपन्याविरुद्ध कार्यवाही करवी, अशी मागणी केली आहे. या संदर्भात सुमारे एक महीन्यापुर्वी निवेदन दिले होते, मात्र यावर काहीच कार्यवाही झाली नाही त्यामुळे आजा हे पैशाची उधळन करून अनोखे आंदोलन करण्यात आले आहे.
हिंगोली कृषी कार्यालयात नोटांची उधळण करून अनोखे आंदोलन.. pic.twitter.com/hPPzY07xdm
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) May 22, 2023
या सर्व प्रकारावर मात्र अद्यापही कृषी विभागाकडून कार्यवाही झाली नाही, त्यामुळे कंपनी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे सारेदोरे असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदअधिकाऱ्यांनी केला आहे. कंपन्यांवर कारवाई होत नसल्याने आज संतप्त कार्यकत्यानी एका टोपल्या मध्ये नोटांचे बंडल घेऊन कृषी कार्यालयात यावेळी अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा निषेध करत नोटांची उधळन केली. अधिकाऱ्यांनो नोटा घ्या पण कंपन्यांवर कारवाई करा, अशी घोषणाबाजी करीत नोटांची उधळण करण्यात आली. यावेळी कार्यालयातील परिसरात मोठी गर्दी झाली होती.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हा अध्यक्ष नामदेव पतंगे म्हणतात की, जैविकच्या नावावर बनावट कीटकनाशके विक्री करणाऱ्या कंपन्यावर कारवाई करावी, यासाठी आम्ही एक महीन्यापुर्वी निवेदन दिले होते, मात्र त्यानंतरही अधिकाऱ्यांनी कार्यवाही केली नाही.. त्यामुळे आज कृषी कार्यालयाच्या परिसरात नोटांची उधळण केली आहे. आता प्रशासनाच्या वतीने यावर काबी कार्यवाही केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.