बेंगळुरू – एखाद्या राज्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठीचे सध्याचे जे निकष आहेत ते बदलण्याची मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्र सरकारला केली आहे. दुष्काळाच्या स्थितीबाबत प्रत्येक राज्याची वास्तविकता मान्य करणारी आणि वेळेवर मदत देणारी अधिक प्रतिसादात्मक फ्रेमवर्क तयार करण्यासाठी केंद्र सरकारने निर्णय घेतला पाहिजे असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
कर्नाटकात झालेल्या अपुऱ्या नैऋत्य मोसमी पावसाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना ‘दुष्काळ व्यवस्थापनासाठी 2016 मध्ये निश्चीत करण्यात आलेल्या “कठोर” मापदंडांत बदल करून 2020 मध्ये ते अद्ययावत करण्यात आले आहेत त्यानुसार निकष निश्चीत केले जावेत असे म्हटले आहे.
सध्याच्या नैऋत्य मान्सूनच्या मोसमात, कर्नाटकात 336 मिमीच्या सामान्य पावसाच्या तुलनेत 234 मिमी पावसाची नोंद झाली आहे, त्यात 34 टक्के कमतरता आहे. अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असूनही, आम्ही दुष्काळ जाहीर करू शकलो नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यातही अडचणी निर्माण होतात.
हवामानातील बदलामुळे निर्माण झालेल्या अनिश्चित हवामानाच्या परिस्थितीमुळे दुष्काळ जाहीर करण्याच्या सध्याच्या मापदंडांचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक बनले आहे. हे मापदंड अधिक लवचिक आणि शेतकरी हिताचे असले पाहिजेत असे त्यांनी म्हटले आहे.