नेवासा दि.३१ (प्रतिनिधी) – नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी केली जात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेवासा तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.शेतकऱ्यांकडून एकरी ४०० रुपयांची मागणी करण्यात येत आहे.याबाबत पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यापार्श्वभूमीवर पिकांच्या नुकसानीचे पंचनामेकरून तत्काळ मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी राज्यसरकारकडे केली आहे.
नेवाशातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे तक्रार केलेली आहे तालुक्यातील जेऊर हैबती,चिलेखनवाडी व देवडे येथील पिकांचे पंचनामे करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांकडून एकरी ४०० प्रशासनाला दिले जात होते.त्यामुळे नगर जिल्ह्यात सध्या तहसील कार्यालयामार्फत तसेच कृषी विभागामार्फत गावोगावी खासगी एजंट नेमून पंचनामे करण्यासाठी एकरी ४०० रुपयांची मागणी करत असल्याची तक्रार केल्या जात आहेत.अद्याप पंचनामे पूर्णत्वाला आलेले नसून खासगी एजंड कृषी खात्यांच्या कर्मचाऱ्यांची नावे सांगून रक्कम मागत असल्याचा व्हिडिओ आणि अॅडिओ बॉम्बने जिल्ह्यात खळबळ उडवून दिलेली आहे.
नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी नेवासा तालुक्यातील शिरसगांव दौरा करून परिस्थिती जाणून घेतली.या संदर्भात प्रशासन नेमकी काय कारवाई करते,याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे नेवासा तहसीलदारांकडेही तक्रार केलेली आहे.नेवासा तालुक्यात कृषी विभागामार्फत पिकांचे पंचनामे सुरू आहेत.पंचनामे करण्यासाठी खासगी लोकांना (एजंट) पाठविले जात आहे. अधिकृत कृषी अधिकारी शेतात न जाता एजंट पाठवून पैशांची वसूली केली जात आहे.
नेवासा तालुक्यातील एक व्हिडीओ आणि अॅडिओ व्हायरल झालेला असून यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.सोयाबीनच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पथकातील संबंधिताने ‘शेतकऱ्यांकडे एकरी चारशे रुपयांप्रमाणे पैसे द्या’,अशी मागणी केली. एजंटने शेतकऱ्यांकडे केलेली होती यावेळी शेतकऱ्यांनीविरोध करत ‘तुम्हाला पैसे घेण्याचे कोणी सांगितले ? असा प्रश्न केला असता यावेळी मोरे मॅडम यांनी आम्हाला अशा प्रकारचे आदेश दिले असल्याचे सांगत आत्तापर्यंत कोणी कोणी पैसे दिले,याची यादी शेतकऱ्याला दाखविल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून येते.खासगी लोक शेतकल्यांकडे पंचनामा करण्यासाठीएकरी ४०० रुपयांची मागणी करीत आहेत.त्याशिवाय पंचनामे करीत नाहीत.शेतकऱ्यांकडून अनधिकृतपणे पैसे घेणाऱ्यांवर कारवाई करून निलंबित करावे,अशी मागणी नायब तहसीलदारराजेंद्र गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.यावेळी अनिल ताके,गणेश ताके,मोहन म्हस्के यांच्यासह शेतकरी उपस्थित यावेळी उपस्थित होते.
राज्यात झालेल्या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झालेले आहे.शेतकऱ्यांना शेतात जाणेही मुश्कील झाले आहे.पावसाने शेतातील उभी पिके भुईसपाट झाली आहेत.सोयाबीन कापूस,गहू यांसारख्या पिकांसह भाजीपाल्यांची मोठी नुकसान झालेली असतांना कृषी खात्यातील कर्मचाऱ्यांची धडाधड नांवे सांगितले जात असतांना कारवाई केली जात नसल्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.