– हिमांशू
गुढीपाडव्याच्या आदल्या रात्रीची घटना. निर्जन रस्त्यावरून एक गाडी निघाली आहे. एका लिंबाच्या झाडापाशी ही गाडी थोडा वेळ थांबते. नंतर निघून जाते. ही मंडळी कोण, कुठली, इथे कशासाठी आली, अपरात्री निर्जन रस्त्यावरच्या झाडाखाली का थांबली, याबद्दल कुणालाही शंका येत नाही. तिथून थोड्याच अंतरावर गाव आहे. सुमारे आठवड्यानंतर या झाडावर एक अजब गोष्ट दिसून येते. एका बोकडाच्या मागील पायांना दोरी बांधून त्याला झाडाच्या ङ्गांदीला उलटं लटकावून ठेवलंय, हे लक्षात येतं. तोपर्यंत या आडबाजूला कुणीच ङ्गिरकलेलं नसावं. बोकड मृतावस्थेत आहे. परंतु जेव्हा झाडाला टांगलं तेव्हा ते जिवंत असावं आणि इतके दिवस तशाच स्थितीत राहिल्यामुळं त्याचा उपासमारीनं मृत्यू झाला असावा. हे सगळं कुणी केलं? हा प्रश्न तर लोकांना पडतोच;
पण त्याहून अधिक कोड्यात टाकणारा प्रश्न असतो, हे कशासाठी केलं? बोकडाचा अंधश्रद्धेशी संबंध नेहमीच येतो. त्यामुळं हे अघोरी कृत्य असावं आणि एखाद्या मांत्रिकाच्या सांगण्यावरून कुणीतरी हे केलं असावं, या निष्कर्षाप्रत सगळे येतात. मग गावचे सरपंच, तंटामुक्ती समिती वगैरेंना माहिती दिली जाते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची टीम येते. पोलिसांना कळवलं जातं. गावकर्यांकडे चौकशी केली जाते. कुणीतरी काही दिवसांपूर्वी अपरात्री गाडी थांबलेली पाहिली, एवढीच त्रोटक माहिती मिळते. पण असा प्रकार यापूर्वी कुणीही पाहिलेला, ऐकलेला नसतो.
रूढी-परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा यापेक्षा ‘प्रसाद’ महत्त्वाचा असतो. परंतु हा प्रकार जरा वेगळाच! एक तर बळी द्यायचाच नाही… आडबाजूच्या एखाद्या झाडाला बोकड ङ्गक्त टांगून ठेवायचं. यथावकाश उपासमारीनं तडङ्गडून ते मरेल. सांगलीजवळच्या कवलापूर परिसरात या प्रकाराची सध्या जोरात चर्चा चाललीये. गेल्याच महिन्यात याच गावाजवळ रसूलवाडी रस्त्यावरही असाच प्रकार बघायला मिळाल्याचं गावकरी सांगतात. गुढीपाडव्याचा आधी होती सोमवती अमावस्या. अमावस्या म्हटलं की आपल्याकडे अघोरी प्रकारांना ऊत येतो. रस्त्यात कुठेही लिंबू ओवाळून टाकलेलं दिसतं. हळदकुंकू वाहिलेला नारळ दिसतो.
कुठं कोहळा तर कुठं झाडाला सुया टोचलेल्या दिसतात. सामान्यतः कुणाचंतरी वाईट करायचं म्हणून किंवा कुणीतरी वाईट केलंय, ते ‘उतरवायचं’ म्हणून असले प्रकार केले जातात. पण महिन्याच्या अंतरानं एकाच परिसरात उघडकीला आलेले हे दोन प्रकार क्रौर्याची परिसीमा गाठणारे. असं काहीतरी केलं तर आपलं चांगलं होईल किंवा वाईट होणं टळेल, आलेलं संकट टळेल किंवा आपल्यावर संकट आणणार्याचं वाटोळं होईल, असं मानण्याच्या वृत्तीला काय म्हणावं? यामुळं ङ्गक्त मांत्रिकाला बरकत येते.
आपलं राज्य खूप पुढारलेलं. असले जादूटोण्याचे प्रकार टाळले जावेत, लोकांना त्यातला ङ्गोलपणा समजावा, असं करणं चुकीचं आहे याची जाणीव व्हावी यासाठी आपल्याकडे कायदा आहे. पण कायद्याची अंमलबजावणी करणार्या पोलिसांनीच आपल्या ठाण्याच्या परिसरातली गुन्हेगारी आटोक्यात यावी म्हणून ठाण्याच्या आवारात बोकड कापल्याची घटना काही महिन्यांपूर्वी लातूरमध्ये उघड झाली होती. तिथे किमान बिर्याणीचा बेत तरी होता. पण कवलापूरला जे घडलं ते माणूस म्हणवून घेणार्या कुणालाही शोभणारं नाही. असे अमानवी‘तोडगे’ देणार्यांना रोखलंच पाहिजे!