देहूरोड,(वार्ताहर) – देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील वाढते अतिक्रमण आणि रस्त्यावर होणारे पार्किंगकडे प्रशासनाचे होणाऱ्या दुर्लक्षाने बाजार पेठेतील रस्त्याचा श्वास वाहतुक कोंडीने गुदमरत आहे. बाजारपेठ मोकळा श्वास कधी घेेईल का? असा सवाल नागरीक करीत आहे. विविध जाती-धर्मातील नागरिक वास्तव्यास असल्याने देहुरोडला मिनी इंडिया म्हणून संबोधले जाते.
मुंबई पुणे व इतरत्र जाण्यासाठी जवळच असणारे रेल्वे स्थानक, मुंबई पुणे महामार्मामुळे बाजार पेठेला महत्त्व आले आहे. येथील बाजारपेठेत आसपासच्या परिसरातील नागरिक खरेदी करण्यासाठी येत असतात.
गत दशकात प्रशासनाने आणि तात्कालीन सदस्यांनी वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी अबुशेठ मार्ग, भाजी मंडई परीसर आणि बाजारपेठेतील दुतर्फा असलेले व्यापाऱ्यांची दुकाने पाडत ४० फूट रुंदीचा रस्ता तयार केले. लाखो रुपये खर्चून दुर्तफा पदपथ आणि त्यावर संरक्षक लोखंडी जाळया लावण्यात आल्या. तीन व चारचाकी तसेच मालवाहतुक वाहनांचा बाजारपेठेतील प्रवेश बंदी बाबतचा निर्णय न झाल्याने वाहनतळासाठी सम विषम तारखेचे ’पी–वन, पी–टू’ फलक व रस्त्याच्या दुतर्फा रेडियमचे पोल उभारले होते.
मात्र प्रशासनाच्या अनियोजनाने त्यावर अद्याप पर्यत अमंलबजावणी झालीच नाही. गत पंचवार्षिकेत लाखाे रूपये खर्चत दुर्तफा असणारी खुली गटारे बंदीस्त करण्यात आली. प्रशासनाने कामांकडे दुर्लक्ष केल्याने व्यापाऱ्यांसह लघु उद्योजक, पानफुल विक्रेते, खाद्यपदार्थासह इतर फळ-भाजीपाल्यांचे हाथगाडया, पथारीवाल्याचे अतिक्रमण वाढतच गेले. अनेक ठिकाणी लोंखंडी संरक्षक जाळया गायब करीत हारफुल विक्रेते, .पथारीवाले, व्यापाऱ्यांची साहित्य, जाहीरातीचीं फलकांनी रस्त्यांवर, पदपथावर केलेल्या अतिक्रमणांने पादचाऱ्यांना चालण्याचे कठीण झाले आहे.
हॉकर्स झोन नावालाच
पंडित नेहरू मंगल कार्यालयाजवळ हॉर्कस झोन केल्यानंतरही आंबेडकर रोड, बाजारपेठ व अबूशेठ मार्ग आणि विकासनगरकडे जाणाऱ्या मार्गावर हातगाड्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला आहे. तर अमृततुल्ये, स्नॅक सेटर, भंगार, मोबाइल शॉपी व्यवसायिकांनी कहर करीत पदपथांसह रस्त्यांवरील अतिक्रमणे वाहतुक कोंडीला कारणीभूत ठरले आहेत. रेल्वे स्थानकासाठी वर्दळीचा असणारा अबुशेठ मार्गावर व्यापाऱ्यांनी तर कहर केला आहे. विद्युत पोल भूमिगत गटारे यावरही पत्राशेड बांधत रस्त्यांचा मध्य गाठला आहे. त्यामुळे विद्यार्थी, महीला, ज्येष्ठ नागरिक, पादचारी यांना चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
कॅन्टोमेंट बोर्डाचे अभय
बोर्डाच्या हद्दीतील वाढत्या अतिक्रमणावर कारवाई होत नाही. यामुळे देहरोड कॅन्टोमेंट बोर्डाने त्यांना अभय दिल्याची चर्चा नागरिकांमधून सुरू आहे. प्रशासनने अलिखीत,अघोषीत अतिक्रमणधारकांना वाव देत आहे. त्यामुळे अतिक्रमण आणि रस्त्यावर होणाऱ्या वाहतुक कोंडीतुनदेहूरोडकरांसह रस्ते गुदमरलेल्या कोंडीतुन श्वास घेईल का ?असा प्रश्न निर्माण झाले आहे.
अचानक कारवाईची गरज
वाढती अतिक्रमणे थांबण्यासाठी कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक कारवाई तसेच दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे. करण्याची गरज आहे. वाहन पार्कीगसाठी सम–विषम तारखांचे व वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे.