नवी दिल्ली: देशातील कोरोना संसर्गाचे संकट आणि देशाच्या सीमेवर चीनसारख्या शेजारच्या देशाशी सुरू असलेल्या तणावाच्या परिस्थितीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एक मोठे विधान केले आहे. देशातील रुग्णालयात आणि सीमेवर सैन्य पूर्णपणे तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजनाथ यांनी दिल्लीत बनलेल्या सरदार वल्लभभाई पटेल कोविड रुग्णालयाच्या भेटीत हे सांगितले. राजनाथ सिंह व्यतिरिक्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही नव्याने बांधलेल्या या रुग्णालयाला भेट दिली.
केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कोविड -१९ रूग्णांच्या उपचारासाठी नव्याने निर्मित १००० खाटांच्या तात्पुरत्या रुग्णालयात भेट दिली. यावेळी पत्रकारांनी संरक्षण मंत्र्यांना लडाखमध्ये चीनबरोबर सुरू असलेल्या तणावाबद्दल विचारले असता, उत्तर देताना राजनाथ म्हणाले की, आमची तयारी तिथेच असते, हॉस्पिटल असो की सीमा.
गलवान खोऱ्यात १५ जूनच्या रात्री भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला, ज्यामध्ये भारतीय लष्कराचे २० सैनिक शहिद झाले, तर चीनलाही मोठे नुकसान झाले. त्यानंतर एकीकडे दोन्ही देश लष्करी व मुत्सद्दी पातळीवर हा विषय शांत करण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर दुसरीकडे एलएसीच्या दोन्ही बाजूंच्या सैन्यांची कार्यवाही वाढली आहे.