मुंबई : महाराष्ट्रात शिवसेनेशी लढतानाही मोदी एकटे नव्हते, तर राज्यपाल कोश्यारी त्यांच्या ‘गोल्डन गँग’चे सदस्य होते. या ‘गोल्डन गँग’च्या सदस्यांना लाभाची पदे व आमिषे देऊन लढाईला उतरणे ही काही मर्दुमकी नाही, अशी टीका पंतप्रधान मोदींवर शिवसेनेकडून करण्यात आली होती. या टीकेला भाजपाकडून सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखातून बरीच ‘ऍसिडिटी’ फ्लश झाली आहे, असा टोला त्यांनी लगावला.
तपास यंत्रणा यांना आता विंचू, मगरी सारख्या वाटतात, पण 25 वर्षे मुंबईकरांचे रक्त शोषून भ्रष्टाचार केलात त्याचे काय?
कुठल्या गोल्डन गँग विषयी इशारे करताय?
याकुब,नवाब, हसीना पारकर, सरदार शहावली खान ही तुमची दाऊद गँग केव्हाच उघडी पडलेय.
पंतप्रधान बोलले त्याची एवढी सुपारी लागली?
1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 13, 2023
‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आलेल्या टीकेला आशिष शेलार यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे. ‘‘तपास यंत्रणा शिवसेनेला आता विंचू, मगरी सारख्या वाटतात. पण २५ वर्षे मुंबईकरांचे रक्त शोषून भ्रष्टाचार केला त्याचं काय? शिवसेना नेमकी कोणत्या गोल्डन गँग विषयी इशारे करत आहे?” असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसेच ‘‘याकूब, नवाब, हसीना पारकर, सरदार शहावली खान ही तुमची दाऊद गँग केव्हाच उघडी पडली”, असेही ते म्हणाले.
होय! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छातीठोकपणे सांगितले,
‘एक अकेला कितनों पर भारी है…!’
हे शब्द काही जणांसाठी “धौतीयोग”सारखे लागलेत. ज्यांना ही “मात्रा” लागू पडली त्यांना मळमळ, जळजळ होणारच!
आजच्या सामनाच्या अग्रलेखातून बरिच “ऍसिडिटी” फ्लश झालेय!
होऊ दे एकदम साफ!!
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 13, 2023
‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छातीठोकपणे सांगितलं, की ‘एक अकेला कितनों पर भारी है…!’ हे शब्द काही जणांसाठी ‘धौतीयोग’ सारखे लागले आहेत. ज्यांना ही मात्रा लागू पडली, त्यांना मळमळ, जळजळ होणारच. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून बरीच ‘ऍसिडिटी” फ्लश झाली आहे”, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.