पुणे -शहरात करोनाची साथ उतारणीला लागली असली, तरी दिवाळीनंतर नवीन बाधितांची संख्या वाढण्याची भीती आहे. त्यामुळे संसर्गाला पायबंद घालण्यासाठी नागरिकांनी मास्क वापर करावाच, यासाठी महापालिका वारंवार आवाहन करत आहे.
तर, मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई वाढवण्यासाठी उप अभियंत्यांपासून ते क्षेत्रीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना मास्क न वापणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतरही मास्क न वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे अशा नागरिकांच्या चुकीमुळे तिसऱ्या लाटेचा धोका शहरावर घोंगावत असल्याचे चित्र आहे.
शहरात करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने थैमान घातले. त्यानंतर गेल्या दीड वर्षांत या साथीने शहराच्या आर्थिक उलाढाल तसेच आरोग्य व्यवस्थेवर गंभीर परिणाम झाले आहेत. असे असतानाच, ही साथ रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरल्यास साथीला थोपवण्यास मोठी मदत होते. त्यामुळे करोना रुग्णसंख्या उतरणीला लागल्यानंतर शहर पूर्वपदावर येताना नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्क वापरणे अद्यापही बंधनकारक आहे.
तसेच खासगी कार्यालये, आस्थापना, शासकीय कार्यालये यांनीही मास्क नसल्यास अभ्यंगत तसेच कर्मचाऱ्यांनाही कामावर उपस्थित राहण्यास मनाई केली आहे. मात्र, त्यानंतर आता पुन्हा एकदा शहरात करोनाचे रुग्ण कमी होत असतानाच; आता पुणेकर पुन्हा मास्क वापरले जात नसल्याचे चित्र आहे.
त्यामुळे मास्कचा वापर प्रभावीपणे व्हावा, या उद्देशाने आयुक्तांनी महापालिकेचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक, अधीक्षक अभियंता, विभाग प्रमुख यांना कारवाईचे अधिकार दिलेले आहेत. मात्र, हे केवळ अधिकारच राहिले असून केवळ घनकचरा विभागाच्या आरोग्य निरीक्षकांकडूनच ही कारवाई होत असून त्यातही सातत्य नाही. त्यामुळे हा चिंतेचा विषय झाला आहे.
खेड तालुक्यात आलेख घसरला
राजगुरुनगर -खेड तालुक्यात करोनाचा आलेख घसरला आहे. मागील काही दिवसांपासनू रुग्णसंख्या घअल्याचे दिसत आहे. मंगळवारी (दि. 9) खेड तालुक्यात राजगुरुनगर, चाकण तसेच आळंदी नगरपालिका क्षेत्रात एणकही रुग्ण आढळला नाही. चाकण एमआयडीसीतील महाळुंगे इंगहे येथे केवळ एक रुग्ण आढळला आहे. तीहदेखील नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.