नवी दिल्ली :– दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या भारत-अफगाणिस्तान सामन्यात जगभरातील चाहत्यांच्या नजरा विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यावर खिळल्या होत्या. अफगाणिस्तानचा युवा गोलंदाज नवीन उल हक व भारताचा प्रमुख फलंदाज विराट कोहली यांच्यात आयपीएल स्पर्धेदरम्यान शाब्दीक चकमक उडाली होती, व त्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये सातत्याने खुन्नसच पाहायला मिळाली होती.
त्या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या भारत व अफगाणिस्तान लढतीत त्यांच्यातील मैत्रीपर्व सुरु झाल्याचे चाहत्यांना दिसले. यावेळी कोहली फलंदाजी व नवीन उल हक गोलंदाजी करत असताना चाहते त्याला ट्रोल करत होते. त्याच्या नावाच्या घोषणाही देत होते. हे पाहून कोहलीने प्रेक्षकांना असे करु नका म्हणून विनंती केली. कोहलीने हात उंचावत हे केलेले आवाहन प्रेक्षकांच्या दृष्टीने कौतुकाचा विषय ठरले व नवीन उल हकला ट्रोल करणे लगेचच थांबले.
#CWC23 #INDvAFG : बुधवारी झालेल्या भारत व अफगाणिस्तान लढतीत विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात मैत्रीपर्व सुरु झाल्याचे चाहत्यांना दिसले.
Virat Kohli asks Delhi crowd to not boo Naveen-ul-Haq in India vs Afghanistan clash pic.twitter.com/Kydq34q6sc— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 12, 2023
दरम्यान, दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर काल झालेल्या सामन्यात भारत आणि अफगाणिस्तानचे संघ आमनेसामने होते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अफगाणिस्तानचा सहज पराभव केला. भारताला सामना जिंकण्यासाठी 273 धावांचे लक्ष्य होते. टीम इंडियाने 35 षटकांत 2 बाद 273 धावा करत सामना जिंकला.