Virat Kohli On Retirement : विराट कोहलीचे नाव ऐकले की प्रत्येक क्रिकेट चाहत्यांच्या मनात महान खेळाडूची छाप निर्माण होते. विराट कोहली सध्याच्या काळातील महान क्रिकेटपटू आहे. आज जगभरातील लोक क्रिकेटला त्यांच्या नावाने ओळखतात. 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या विराट कोहलीने एका दशकाहून अधिक काळ या खेळावर राज्य केले आहे. हळूहळू विराट या खेळातून निवृत्त होण्याची वेळ जवळ येत आहे. त्याला हे देखील माहित आहे की, तो कायमचे खेळत राहू शकत नाही पण क्रिकेटला अलविदा करण्यापूर्वी त्याला त्याचे सर्वस्व त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला द्यायचे आहे. असं असताना विराट कोहलीने आपल्या निवृत्तीबाबत पहिल्यांदाच वक्तव्य केलं आहे.
कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी 13 सामन्यात 661 धावा केल्या आहेत. या मोसमात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही तो ठरला आहे. दरम्यान, आरसीबीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये 35 वर्षीय खेळाडू त्याच्या निवृत्तीची चर्चा करताना दिसत आहे. आरसीबीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये 35 वर्षीय कोहलीने असे म्हटले आहे की, “पश्चाताप न करता जगण्याची इच्छा हीच त्याची प्रेरणा आहे. मला कोणतेही काम अपूर्ण ठेवायचे नाही जेणेकरून नंतर पश्चाताप होऊ नये. काम झाल्यावर मी निघून जाईन आणि काही काळ पुन्हा दिसणार नाही.”
“I wanna give it everything I have till the time I play, and that’s the only thing that keeps me going” 🤌
Virat’s emotional but promising words while talking at the @qatarairways Royal Gala Dinner. 🗣️#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2024 pic.twitter.com/htDczGQpNf
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 15, 2024
कोहली पुढील महिन्यात होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा सदस्य असून यावेळी चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. विराट कोहलीलाही टी-20 विश्वचषकादरम्यान त्याचा सध्याचा फॉर्म कायम ठेवायला आवडेल. 35 वर्षीय कोहलीचा हा शेवटचा टी20 विश्वचषक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कोहलीने टीम इंडियाच्या टी20 संघातून निवृत्ती जाहीर केली तरी आश्चर्य वाटायला नको.
पुढे कोहली म्हणाला की, “जोपर्यंत मी खेळत आहे तोपर्यंत मला माझे सर्वस्व खेळाला द्यायचे आहे. ही माझी प्रेरणा आहे. कोहली म्हणाला की, प्रत्येक खेळाडूच्या करिअरमध्ये एक शेवटची वेळ येते. मी सुध्दा कायम खेळत राहणार नाही, पण ‘त्या दिवशी ते केले असते तर बरे झाले असते’ या भावनेत मला कायम राहायचं नाही.”
दरम्यान, या विश्वचषत स्पर्धेत विराट कोहलीकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. गेल्या 11 वर्षापासून टीम इंडियाने एकही आयसीसी चषक जिंकलेला नाही. त्यामुळे यंदाचा टी20 विश्वचषक भारतानं जिंकावा अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे.