इस्लामाबाद – कराचीमध्ये गेल्या पाच महिन्यांत गोळीबार आणि इतर रस्त्यावरील गुन्ह्यांमुळे अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. मे महिन्यात कराचीमध्ये 7843 स्ट्रीट क्राईमची नोंद झाली आहे. दोन दिवसांपूर्वी गुलशन इक्बाल येथील कामरान चौरंगीजवळ काही दुचाकीस्वार दरोडेखोरांनी विद्यापीठाचे वाहन अडवून त्यात बसलेल्या विद्यार्थी व शिक्षकांना लुटून पळ काढला होता.
लाहोर, इस्लामाबादसह कराचीतील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था हे सिंध सरकारसमोर मोठे आव्हान बनले आहे. बहुतांश जिल्ह्यात रस्त्यावरील गुन्हेगारी झपाट्याने वाढत असून, त्यामुळे नागरिक भीतीच्या वातावरणात जगू लागले आहेत. चोर, दरोडेखोर कोणालाही न जुमानता राजरोस आणि उघडपणे गुन्हे करत आहेत.
कराचीतील अराजकता थांबवण्यासाठी सिंधच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर यावर कारवाई करणे आवश्यक आहे, जेणेकरून कराचीतील लोक शांततेने जगू शकतील, असे माध्यमांचे मत आहे.